HW News Marathi
महाराष्ट्र

आमच्या मिरवणुकांवर दगडफेक होत असेल, तर आम्ही गप्प बसणार नाही!, राज ठाकरेंचा इशारा

मुंबई | आमच्या मिरवणुकांवर दगडफेक होत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. राज ठाकरेंनी आज (१७ एप्रिल) पत्रकार परिषदेत पुन्हा मशिदीवरील भोंग्यांवरून तोफ डागली. १ मे रोजी संभाजीनगरमध्ये सभा घेणार असून ३ तारखेपर्यंत भोंगे बंद झाले नाही तर जशास तसे उत्तर देऊ आणि ५ जून रोजी मी अयोध्येला जाणार असल्याची त्यांनी घोषणा केली, या गोष्टी सांगण्यासाठी पत्रकार परिषद घेतल्याची माहिती राज ठाकरेंनी दिली. 

राज ठाकरे म्हणाले, “भोंग्याचा सामाजिक आणि धार्मिक विषय नाही तर हा सामाजिक विषय आहे. दोन गोष्टी आपल्याशी बोलयाच्या होत्या म्हणून पत्रकार परिषद घेतली. भोंग्याचा त्रास फक्त हिंदुंना होत नाही तर मुस्लिमांनाही होतो. ३ तारखेपर्यंत भोंगे बंद झाले नाही तर जशास तसे उत्तर देऊ. महाराष्ट्रातील शांतता भंग करण्याची इच्छा नाही, पण भोंग बंद करा. पाच वेळा जर भोंगे लावला तर पाच वेळा हनुमान चालिसा लावू. पुढील सभा ही १ मे रोजी संभाजीनगरमध्ये घेणार आहे. ५ जून रोजी मी अयोध्येला जाणार असल्याची त्यांनी घोषणा केली.”

मशिदीवरील भोंगे हे अनधिकृत आहेत तर मग…आमच्या भोंगांवर कारवाई का करता, असा सवाल राज ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला आहे. राज ठाकरे पुढे म्हणाले,” देशापेक्षा कोणताही धर्म मोठा होऊ शकत नाही. देशातल्या सर्व हिंदू बांधवांनी तयार रहावा. आमच्या मिरवणुकांवर दगडफेक होत असेल तर गप्प बसणार नाही, असा इशारा त्यांनी पत्रकार परिषदेतून  दिली आहे. 

राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे

  • आमच्या मिरवणुकांवर दगडफेक होत असेल तर गप्प बसणार नाही
  • शांतता भंग होत असेल तर परवानगी नको, असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय  
  • मशिदीवरील भोंगे हे अनधिकृत आहेत तर मग…आमच्या भोंगांवर कारवाई का करता, असा सवाल राज ठाकरेंनी उभा केला आहे.
  • ५ जून रोजी मी अयोध्येला जाणार असल्याची त्यांनी घोषणा केली
  • १ मे रोजी संभाजीनगरमध्ये सभा घेणार आहे 
  • महाराष्ट्रातील शांतता भंग करण्याची इच्छा नाही, पण भोंग बंद करा, माणुसकी म्हणून मुस्लिम धर्मियांनी विचार करावा, प्रार्थनेला विरोध नाही.
  • देशातील सर्वोच्च न्यायालय आणि कायद्यापेक्षा स्वत:चा धर्म मोठा वाटत असेल तर मला वाटते की लाऊड स्पिकर वाटत असेल, तर त्यांना जशास तसे उत्त देण्याची गरज आहे
  • ३ तारखेपर्यंत भोंगे बंद झाले नाही तर जशास तसे उत्तर देऊ
  • आता रमजान सुरू आहे, म्हणून काही करायचे नाही
  • देशातल्या सर्व हिंदू बांधवांनी माझी विनंती आहे की, तुम्ही तयार रहा
  • पाच वेळा जर भोंगे लावला तर पाच वेळा हनुमान चालिसा लावू
  • भोंग्याचा त्रास फक्त हिंदुंना होत नाही तर मुस्लिमांनाही होतो. 
  • दोन गोष्टी आपल्याशी बोलयाच्या होत्या म्हणून पत्रकार परिषद घेतली
  •  लहान मुलाला त्रास होत होता. हा केवळ हिंदूना नाही तर मुस्लिमांना देखील त्रास होतो
  • एका मुस्लीम पत्रकाराने बाळा नांदगावकरांना आता सांगितले की, माझे लहान मुल जन्माला आले, तेव्हा सकाळच्या अजाण आणि बांग बंद करण्याबाबत मशिदीत जाऊन सांगितले होते
  • भोंग्याचा सामाजिक आणि धार्मिक विषय नाही तर हा सामाजिक विषय आहे. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रवासी रेल्वेच्या बाबतीत रेल्वेने कोणताही प्रोटोकॉल काढला नाही

News Desk

गोदापार्कचा पॅटर्न पुण्यात राबवण्याचा राज यांचा मनोदय

News Desk

छोट्या गृहनिर्माण सोसायट्यांवर लादण्यात आलेल्या अवाजवी, अनाठायी निवडणूक खर्चाच्या निर्णयाला स्थगिती द्या!

Aprna