HW News Marathi
मुंबई

पुण्याच्या राज्यस्तरीय अधिवेशनात रिपब्लिकन पक्षाची ताकद दाखवा

मुंबई | रिपब्लिकन पक्षाच्या वतीने येत्या रविवारी २७ मे रोजी पुण्यात महाराष्ट्र्र राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी प्रचंड संख्येने सामील होऊन रिपब्लिकन पक्षाची ताकद दाखवावी असे आवाहन रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.

मुलुंड सिमेंट कॉलनी येथे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आयोजित महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संयुक्त जयंती महोत्सवा निमित्त आयोजित जाहीर सभेत रामदास आठवले बोलत होते. यावेळी रिपाइंचे मुलुंड तालुका अध्यक्ष योगेश शिलवंत,अजित रणदिवे, प्रभाकर कांबळे तसेच मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे , जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब गरुड, राज्य सचिव श्रीकांत भालेराव, हेमंत रणपिसे, मुस्ताक बाबा, डॉ विजय मोरे, गीताबेन सोळंकी, नैनाताई वैराट आदी मान्यवर उपस्थित होते.

रिपब्लिकन पक्षाचे हे भव्य अधिवेशन पुण्यातील आर टि ओ जवळच्या एस एस पी एम एस मैदानावर रविवार दि २७ मे रोजी दुपारी ४ वाजता आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. रिपब्लिकन पक्षासोबत बहुसंख्य प्रमाणात समाज आहे हे दाखवून देण्यासाठी प्रत्येक विभागातून मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी समर्थकांसह उपस्थित राहून रिपब्लिकन पक्षाची ताकद दाखवून द्यावी असे आवाहन आठवलेंनी यावेळी केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

औरंगाबादचा कचरा विधानसभेत पेटला, कामकाज तीन वेळा तहकूब

News Desk

LIVE UPDATES | अंधेरी गोखले ब्रीज

News Desk

अक्षयला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

News Desk
महाराष्ट्र

कोल्हापूरच्या महापौरपदी शोभा बोंद्रे तर उपमहापौरपदी महेश सावंत

News Desk

कोल्हापूर | कोल्हापूरच्या महापौरपदाची निवडणुक अत्यंत प्रतिष्ठेची समजली जात होती. परंतु शुक्रवारी झालेल्या निवडणुकीमुळे कोल्हापूरच्या महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या शोभा पंडितराव बोंद्रे यांचा विजय झाला आहे. तर उपमहापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे महेश सावंत यांच्या नावावर शिक्का मोर्तब झाला आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत तटस्थ राहण्याचा निर्णय शिवसेनेने गुरुवारी रात्री घेतला. त्यामुळे काँग्रेसच्या विजयाचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेच्या या निर्णयामुळे निवडणुकीला कलाटणी मिळाल्याची चर्चा आहे.

कोल्हापूरच्या महापौर, उपमहापौर पदासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा पीठासन अधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी अकरा वाजल्यापासून निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. मतदानात अपेक्षेप्रमाणे शोभा बोंद्रे यांना काँग्रेस-राष्ट्रवादीची ४४ मते मिळाली.तर भाजप-ताराराणी आघाडीच्या रूपाराणी संग्राम निकम यांना ३३ मते मिळाली.

उपमहापौरपदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचे महेश सावंत, भाजपचे कमलाकर भोपळे व शिवसेनेचे अभिजित चव्हाण यांच्यात तिरंगी लढत पहायला मिळाली. शिवसेना या निवडणुकीत तटस्थ असली तरीही शिवसेनेचे अभिजित चव्हाण यांना अर्ज मागे घेतला आला नाही. तसेच शिवसेनेचे ४ नगरसेवक गैरहजर राहील्यामुळे सेनेच्या चव्हाण यांना शून्य मते मिळाली. त्याचबरोबर निवडणुकीत राष्ट्रवादीच्या महेश सावंत यांचा विजय झाला. सावंत यांना आघाडीची सर्व ४४ मते मिळाली. भाजप-ताराराणीच्या कमलाकर भोपळे यांना ३३ मते मिळाली. त्यामुळे उपमहापौरपदी राष्ट्रवादीच्या महेश सावंत यांचे नाव निश्चित करण्यात आले.

Related posts

‘उद्धव ठाकरे आणि अजित पवारांनी माझ्यावर पाळत ठेवली’, नाना पटोलेंचा गंभीर आरोप

News Desk

‘निवडणुका पुढे ढकलण्याचा घाट’, ओबीसी आरक्षणावरून राज ठाकरे संतप्त!

News Desk

#COVID19 : कोरोनामुळे पालघरमध्ये पहिला बळी, तर राज्यात १२ रुग्णांचा मृत्यू

swarit