HW News Marathi
मुंबई

बेस्ट संपाचा सहाव्या दिवशीही संप, लेखी आश्वासनाशिवाय माघार नाही

मुंबई | बेस्ट कर्माचऱ्यांच्या आज (१२ जानेवारी) सहावा दिवस आहे. प्रशासन आणि कामगार संघटना हे दोघेही त्यांच्या भूमिकांवर ठाम राहिल्याने अद्याप या संपावर अद्याप कोणताही काही तोडगा निघालेला नाही. बेस्ट कर्मचारी सुधारित वेतन करार, दिवाळीतील सानुग्रह अनुदान, बेस्ट उपक्रमाचे महापालिकेत विलीनीकरण यांसह उर्वरित मागण्या मान्य करण्यासाठी राज्य सरकारसोबत शनिवारी (१२ जानेवारी) झालेल्या बैठकीतही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे बेस्टकामगारांनी पुकारलेला संप सलग सहाव्या दिवशीही सुरूच असून, सोमवारी (१४ जानेवारी) यावर ठोस तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गेल्या पाच दिवसापासून प्रशासन आणि बेस्ट कामगार कृती समिती यांच्यासोबत सतत बैठक करून देखील संपावर तोडगा निघत नाही. बेस्ट कर्मचारी त्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत संप मागे घेण्याची चिन्हे दिसत नाही. बेस्टचा हा संप या दशकातील सर्वात दीर्घकालीन मानला जात आहे. यापूर्वी १९९७ साली बेस्टचा संप तीन दिवस लांबला होता.

बेस्ट कामगार कृती समितीच्या शिष्टमंडळाची शनिवारी मंत्रालयातील मुख्य सचिवांच्या दालनात बेस्ट संपावर तोडगा काढण्यासाठी बैठक झाली. या बैठकीला मुख्य सचिव डी.के. जैन, परिवहन सचिव आशिष कुमार सिंग, नगरविकास सचिव मनीषा म्हैसकर, महापालिका आयुक्त अजय मेहता, बेस्ट व्यवस्थापक सुरेंद्र कुमार बागडे उपस्थित होते.

लेखी आश्वासन दिल्याशिवाय संप मिटणार नाही

सुधारित वेतन करार, बेस्टचे महापालिकेत विलीनीकरण, कर्माऱ्यांच्या निवासस्थानाचा प्रश्न; अशा अनेक मागण्या बेस्ट कर्माऱ्यांनी केल्या आहेत. या मागण्या अडीच वर्षे प्रलंबित आहेत. अडीच वर्षे कर्माऱ्यांच्या मागणीपत्रावर चर्चा सुरू आहे. त्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आहे. आश्वासनावरच बोळवण होत आहे. कर्माऱ्यांच्या मागण्या मान्य केल्याचे लेखी दिल्याशिवाय संप मिटणार नाही, या भूमिकेवर बेस्ट कामगार कृती समिती ठाम आहे.

मुंबईकरांना एसटीची साथ

बेस्टच्या या संपामुळे मुंबईकरांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागेल आहे. संपादरम्यान या दिवसांमध्ये एसटीने मुंबईकरांना दिलासा दिला आहे. संपाच्या पाचव्या दिवशी देखील मुंबईकरांची गैरसोय टाळण्यासाठी एसटीने काल (१२ जानेवारी) दिवसभरात तब्बल ९० बसेस वेगवेगळ्या मार्गावर सुरू ठेवल्या होत्या. मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला नेहरूनगर , पनवेल, उरण ,व ठाणे आगारातून या एसटी बसची सेवा सुरु आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

परमबीर सिंह का नाही बनले मुंबईचे पोलीस आयुक्त ?

News Desk

ही आपत्कालीन परिस्थिती, पालिकेला दोष देऊन चालणार नाही !

News Desk

बोरीवलीत बॉम्ब नसून लहान मुलांचे खेळणे

News Desk