HW News Marathi
मुंबई

भाजपा 60 जागांवर नाखूष – शेलार

मुंबई – भाजपा-शिवसेना युती करून मुंबई महानगरपालिका निवडणूक लढवणार का, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकतेचे वातावरण असताना या निवडणुकीत युतीसाठी शिवसेना जर आम्हाला 60 जागा सोडणार असेल तर आम्ही त्याबाबत समाधानी नाही, असे मुंबई भाजपा अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या आढावा बैठकीनंतर अॅड आशिष शेलार यांनी ही माहिती दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी मुंबई भाजपाच्या निवडणूक समिती, तसेच आमदार आणि खासदार यांच्यासह आढावा बैठक घेऊन संघटन आणि निवडणूक कामाचा आढावा घेतला. याबाबत शेलार यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना माहिती दिली. ते म्हणाले की, मुंबई महापालिका निवडणुकीच्या जाहीरनाम्यातील मुद्द्यांचाही आढावा या वेळी घेण्यात आला असून मुंबईकरांना अपेक्षित पारदर्शक कारभाराबाबत जाहीरनाम्यातल्या मुद्द्यांना या बैठकीत अंतिम स्वरूप देण्यात आले. युतीबाबत आतापर्यंत झालेल्या चर्चेचीही माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आली. युती करताना भाजपाला फक्त साठ जागा सोडण्याची भूमिका हा भाजपाचा अपमान आहे. याबाबत भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. तरीही युतीबाबत आम्ही आश्वासक असून याबाबत पुढील निर्णय मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे घेतील. रात्री पुन्हा प्रदेश निवडणूक समितीची आढावा बैठक मुख्यमंत्री घेणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खूशखबर ! मुंबईतील १० टक्के पाणीकपात रद्द

News Desk

एलएलएम’च्या परीक्षा पुढे ढकला,विद्यार्थी कोर्टात जाणार

swarit

राज्यातील संगणक परिचालकांचे उपोषण स्थगित

News Desk