HW News Marathi
मुंबई

उशिरा पोहचल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेत बसू दिले नाही

मुंबई | पवई आयआयटीमध्ये आज (१३ जानेवारी) एम. एस. डब्ल्यू या टाटाच्या पूर्व परीक्षा घेण्यात येणार होती. परंतु विद्यार्थ्यांना या परीक्षा स्थळी पोहचण्यास उशिराने झाल्याने कॉलेज प्रशासनाने यांना परीक्षेस बसू दिले नाही. बेस्ट कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी सोमवारी ( ७ जानेवारी) मध्यरात्री पासून बेस्टचे ४५ हजार कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत.

या बेस्टच्या संपाचा आज सलग सहावा दिवशी देखील संप सुरू आणि रविवारी रेल्वेचा मेगाब्लॉक असल्यामुळे लोकल ट्रेन असल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेस पोहचण्यास उशीर झाला असल्याचे सांगून देखील विद्यार्थ्यांना पवई आयआयटी कॉलेज प्रशासनाने परीक्षेस बसून दिले नाही. या सर्व प्रकरणावर विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्ती केली आहे.

तसेच उशीरा पोहचलेल्या विद्यार्थ्यांनी आत प्रवेश करून नये, म्हणून कॉलेज प्रशासनाने गेट लावले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना गेट बाहेरच उभे राहून परीक्षा देण्याची विनंती करित होते. परंतु परीक्षेस बसता न आल्याने विद्यार्थी आणि कॉलेज प्रशासनामध्ये वादविवाद झाला. यामुळे विद्यार्थ्यांचे यंदाचे शैक्षणिक वर्ष वाया गेले आहे.

बेस्ट कर्मचाऱ्यांचा सहाव्या दिवशी देखील संप कायम

बेस्ट कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी सोमवारी ( ७ जानेवारी) मध्यरात्री पासून बेस्टचे ४५ हजार कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. या बेस्टच्या संपाचा आज सलग सहावा दिवशी असून या संपावर अद्याप तोडगा निघाला नाही. प्रशासनकडून संपावर तोडगा काढण्याचे अनेक प्रयत्न सुरू आहे. परंतु लेखी आश्वासन दिल्याशिवाय संप मागे घेणार नसल्याची आक्रमक भूमिका बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. या संपाचा परिणाम सर्वसामान्यांवर होता दिसत आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नवी मुंबईत कुत्रे होतायत निळे!

News Desk

महासभेत नगरसेविका गेम खेळण्यात व्यस्त

News Desk

भाजपाला पुण्यात खिंडार

News Desk