HW News Marathi
मुंबई

भाजपच्या ‘आश्वासनाचा फुगा’ जनताच फोडेल

भाजपच्या आश्वासनाचा फुगा जनताच फोडेल

मुंबई छत्रपतीं का आशीर्वाद चलो चले मोदी के साथ असे निवडणुक काळात ब्रीदवाक्य घेत सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महापुरुषांच्या स्मारकाची एकही वीट रचली नाही याचाच अर्थ हे सरकार भूलथापा देवून आपली पोळी भाजून घेण्यात यशस्वी झाले आहे. परंतु हा भूलथापांचा फुगा येत्या काळात जनताच फोडेल असा माझा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे.

अरबी समुद्रामध्ये जाऊन पंतप्रधान मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे जलपूजन केले आणि इंदू मीलमध्ये जावून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे भूमिपूजनही केले. महाराष्ट्रात सत्ता येण्यासाठी या दोन महापुरुषांच्या स्मारकांचा मुद्दा भाजपाने घेतला आणि सत्तेतही आले. परंतु या सरकारने सत्तेत येताना महापुरुषांच्या स्मारकांना जेवढया पध्दतीने महत्व दिले तेवढे महत्व सत्तेत आल्यावर दिलेले नाही. एकीकडे महाराजांच्या नावाने सत्तेत यायचे आणि दुसरीकडे त्यांच्या स्मारकाची वीटही रचायची नाही हा महाराष्ट्रातील जनतेचा अपमान सरकारने केला आहे. निवडणूक काळामध्ये दिलेली आश्वासने या फक्त भूलथापाच होत्या हे आता जनतेच्या लक्षात आले आहे असा आरोपही मलिक यांनी केलाय.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वीरपत्नी लेफ्टनंट स्वाती महाडिक याचा सन्मान

swarit

BREAKING NEWS | मध्य रेल्वेची मुंबईकडे जाणारी सेवा विस्कळीत

News Desk

पोटच्या लेकीला धरणात फेकले

News Desk