HW News Marathi
मुंबई

राज्यात मुलाच्या तुलनेत मुलीचा जन्मदर कमी

मुंबई | राज्यात मुलाच्या तुलनेत मुलीच्या जन्मदर कमी असून देशात महाराष्ट्राचा पाचवा क्रमांक लागत आहे. भ्रूणहत्या याला जबाबदार असल्याचा मुद्दा दिलीप वळसे पाटील यांनी उपस्थित केला.

त्यावर आरोग्यमंत्री दीपक केसकर म्हणाले की, २०१४ ते २०१४ मध्ये एक हजार मुलांमागे महाराष्ट्रात ९०४ इतकी मुलींची संख्या आढळून आली आहे. २०११ ते २०१७ या काळात मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. ८५ सोनोग्राफी मशिन सिल केले आहे.

आतापर्यंत आठ हजार सोनोग्राफी केंद्राची तपासणी केली आहे. ५३० केसेस दाखल झाली आहे. ९६ केसमध्ये ९३ दंड झाली आहे. कालच बिडच्या एका डॉक्टराला शिक्षा झाली आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मंत्रालयात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; नेमके काय घडले?

Aprna

मुंबई पोलिसांच्या डोक्यावर लवकरच नव्या टोप्या

News Desk

तरुणीला धावत्या लोकल ट्रेनमधून फेकलं

News Desk
देश / विदेश

नागरिकतेवर प्रश्न उपस्थित करणे यासारखे दुर्दैव नाही – हमीद अन्सारी

News Desk

नवी दिल्ली – जमावांकडून एखाद्या निष्पाप व्यक्तीची निर्घृणपणे करण्यात येणारी हत्या, ‘घरवापसी’, यांसारख्या घटना घडत असतील, तर ही भारतीय मूल्य कमकुवत होत असल्याची लक्षणे आहेत. तुमच्या भारतीय नागरिकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाणे, यासारखी दुसरी दुर्दैवी घटना नाही, अशा शब्दांत मावळते उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

सलग दुसऱ्यांदा उपराष्ट्रपतिपद भूषवलेल्या अन्सारी यांचा कार्यकाळ आज गुरुवारी संपत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यसभा टीव्हीने त्यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी देशात सध्या सुरू असलेल्या घडामोडीवर भाष्य केले.

‘देशातील मुस्लिम समाजामध्ये सध्या भीती आणि असुरक्षेतेची भावना आहे. मुस्लिम समाजाकडे संशयाने पाहिले जाते. देशातील वेगवेगळ्या भागात मी गेलो, त्यावेळी मला असेच संशयाचे बोल ऐकायला मिळाले. बेंगळुरूला गेलो तेव्हाही मी हेच ऐकले आणि उत्तर भारतातून तर मोठ्या प्रमाणात असेचऐकायला मिळते,’ असेही अन्सारी म्हणाले. देशभर सुरू असलेल्या तीन तलाकवर बोलताना अन्सारी म्हणाले की, तीन तलाकच्या अनुचित प्रथेबद्दल दुमत होऊ शकत नाही. मात्र न्यायालयाने यात हस्तक्षेप करू नये, कारण कोणताही बदल समाजामधूनच होत असतो, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

Related posts

मध्य प्रदेशमध्ये राजकीय भूकंप, ज्योतिरादित्य शिंदे यांचा काँग्रेस पक्षाचा राजीनामा

swarit

राज ठाकरेंना गांभीर्याने घेण्याची गरज नाही !

swarit

भाजप सुकलेल्या तलावात कमळे फुलवीत, सामनातून भाजपवर टीका

News Desk