HW News Marathi
मुंबई

मुंबईतील गारवा होणार १५ दिवसांसाठी गायब 

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीची चाहूल लागली आहे. तर मुंबईमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुंबईकरांना गारवा जाणवत आहे. पण, हा गारवा आता १५ दिवसांसाठी गायब होणार आहे. थंडीसाठी मुंबईकरांना १५ दिवस वाट पहावी लागणार आहे. असे स्कायमेटने म्हटले आहे.

रविवारी मुंबईचे तापमान १७ डिग्री सेल्सिअसपर्यंत घसरले होते. या मोसमातले हे सर्वात कमी तापमान होते. त्यानंतर सोमवारी आणखी १ डिग्रीने खाली आहे. पण ही थंडी नसून केवळ गारवा असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. उत्तरेकडून मुंबईच्या दिशेने थंड वारे वाहत आहेत. त्यामुळे मुंबईचे तापमान घसरल्याचे स्कायमेटने म्हटले आहे. प्रत्यक्षात मात्र मुंबईत थंडी २१ डिसेंबरनंतर येण्याची शक्यता असल्याचे स्कायमेटकडून माहिती देण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडिओ प्रकरण; आदित्य ठाकरेंचा निकटवर्तीय पोलिसांच्या ताब्यात

News Desk

भुजबळांना केईएम मधून डिस्चार्ज

News Desk

कुलगुरूंना हटवताना राज्यपाल दबावाखाली होते का-मुणगेकर यांचा सवाल

News Desk
राजकारण

#Results2018 : राजस्थानमध्ये काँग्रेस सुसाट

News Desk

जयपूर | पाच महत्वाच्या राज्यांच्या निवडणुकांचे निकाल यायला सुरुवात झाली आहे. राजस्थान विधानसभा निवडणुकीचे देखील निकाल सकाळी ८ वाजल्यापासून यायला सुरुवात झाली आहे. पहिल्या राउंडमध्ये एक्झिट पोलवर शिक्कामोर्तब होताना दिसून येत आहे.

राजस्थानमध्ये काँग्रेसने जोरदार मुसंडी मारल्याचे चित्र आहे. काँग्रेसने पहिल्याच राउंडमध्ये ६० जागांवर आघाडी घेतली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसच्या तुलनेत भारतीय जनता पक्ष बराच पिछाडीवर पडल्याचे चित्र पहिल्या राउंडमध्ये आहे. दुसरीकडे भाजपने ४२ जागांवर आघाडी घेतली आहे. पहिल्या राउंडमध्ये मतांचा कल कॉंग्रेसच्या बाजूने येण्यास सुरुवात झाल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष सुरु केला आहे.

Related posts

अखेर एकनाथ शिंदे मुंबईत दाखल; देवेंद्र फडणवीसांसोबत राज्यपालांची घेणार भेट

Aprna

“राजकाणात जे धोका देतात त्यांना योग्य शिक्षा झालीच पाहिजे”, अमित शहांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र

Aprna

…जेव्हा तुम्हाला परदेशी माध्यमे खरेदी करता येत नाहीत !

News Desk