HW News Marathi
मुंबई

दादर स्थानकाचे चैत्यभूमी नामांतर झालेच पाहिजे | दलित युथ पॅंथर

मुंबई | आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त दादर स्थानकाचे चैत्यभूमी नामांतर झालेच पाहिजे या मागणीसाठी दलित युथ पँथरच्या वतीने दादर पश्चिम येथील कामत हॉटेल समोर केशवसुत उड्डाण पुलाखाली निर्दशने करण्यात आली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी उभ्या केलेल्या मानव मुक्तीचा लढा मुंबईतून केला होता. त्यांचे निवासस्थान राजगृह,आंबेडकर चळवळीतील केंद्रबिंदू आंबेडकर भवन दादर हेच होते.

महामानवाचे येथेच अंतिम संस्कार केले होते.म्हणून आमची एकच मागणी आहे दादर स्थानकाचे चैत्यभूमी हे नामांतर झालेच पाहिजे अशी मागणी अध्यक्ष निलेश मोहिते यांनी समस्त दलितांच्या वतीने केली आहे,ती मागणी तीन महिन्यांच्या आत पूर्ण केली नाही तर येत्या ६ डिसेंबरला येणारा मोठा जनसमुदाय हे दादर स्थानक मुंबई तसेच रेल्वे दादर स्थानकावरून एकही रेल्वे पुढे सोडणार नाही याची सरकारने नोंद घ्यावी असा इशारा त्यांनी यावेळी दिला. दलित युथ पँथर ची युवा पिढी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

भांडारकर संस्थेत तोडफोड करणारे संभाजी ब्रिगेडचे ६८ जण निर्दोष

News Desk

स्टॅच्यू ऑफ युनिटीचे शिल्पकार हे भारताचे कोहिनूर | सुधीर मुनगंटीवार

News Desk

वाघ चिन्ह असणा-याकडेही लक्ष द्या | धनंजय मुंडे यांचा मिश्किल सवाल

News Desk
महाराष्ट्र

धान संशोधक दादाजी खोब्रागडे यांचे निधन

News Desk

चंद्रपूर | तांदळाच्या नऊ जातीचा शोध लावणाऱ्या कृषिभूषण दादाजी खोब्रागडे यांचे रविवारी सायंकाळी निधन झाले. खोब्रागडे हे गेल्या काही महिन्यांपासून अर्धांगवायू या दुर्धर आजाराशी झुंज देत होते. चंद्रपुरातील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. खोब्रागडे यांना आज दुपारी त्यांच्या मूळ गावी नांदेड येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

खोब्रागडे यांच्याकडे मोजकीच जमीन होती. या जमिनीवर त्यांनी शेतीतील धानावर विविध प्रयोग केले. फक्त तिसरी शिकलेले खोब्रागडे यांनी एचएमटी या प्रसिद्ध अशा तांदळाचा शोध लावला. या तांदळाचा शोध लावून न थांबता. त्यांनी विजय नांदेड, नांदेड ९२, नांदेड हिरा, डीआरके, नांदेड चेन्नूर, नांदेड दीपक, काटे एचएमटी आणि डीआरके टू या नऊ तांदळाचे वाण दादाजी खोब्रागडे यांनी विकसित केले आहे.

  • दादाजी खोब्रागडे यांचा अल्प परिचय

दादाजी रामजी खोब्रागडे यांचे संपूर्ण नाव होते. ते चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील नांदेड येथील रहिवासी होते. खोब्रागडे यांनी १९८५ ते १९९० या काळात त्यांनी धानाच्या नऊ नवीन वाणांचा शोध लावला. खोब्रागडे यांनी धान संशोधन क्षेत्रातील मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यांच्या या कार्य बदल फोर्ब्सने २०१० मध्ये जगातील सर्वोत्तम ग्रामीण उद्योजकांच्या यादीत त्यांना मानाचे स्थान दिले होते.

५ जानेवारी, २००५ रोजी अहमदाबाद येथे तत्कालिन राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या हस्ते ५० हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला. तर २००६ मध्ये महाराष्ट्र शासनानेदेखील त्यांना कृषिभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे.

Related posts

केंद्र सरकारने जाचक रस्ते विकास सेस बंद करावा किंवा देशभरातील टोल तरी बंद करावेत !-  नाना पटोले

News Desk

Maharashtra Budget 2022 LIVE Updates : कळसूत्री सरकारने पंचसूत्री बजेट मांडले, फडणवीसांची टीकास्त्र

Aprna

“वर्षभर ३ पक्ष एकत्र विटी दांडू खेळत होते का”, भाजपचा परखड सवाल

News Desk