HW News Marathi
मुंबई

आरोग्यमंत्र्यांचा तडकाफडकी राजीनामा

मुंबई | मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पक्षाने पुन्हा संधी नाकारल्यामुळे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी राजीनामा दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे डॉ दीपक सावंत यांनी राजीनामा सुपूर्द केला. परंतु मुख्यमंत्र्यांनी मात्र सावंत यांना राजीनामा देऊ नका असे म्हणत थांबवण्याचा सल्ला दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी दीपक सावंत यांना मंगळवारी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीला हजर रहायला सांगितले आहे. दीपक सावंत यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतल्याची माहिती सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्याआधी सावंत यांनी ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरेंकडे राजीनामा सुपूर्द केला. मुंबई पदवीधर मतदारसंघातून होणाऱ्या निवडणुकीच्या उमेदवाराबाबत मोठा निर्णय घेताना शिवसेनेने विलास पोतनीस यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी तडकाफडकी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला.

शिवसेनेने पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत विलास पोतनीस शिवसेनेचे बोरिवलीचे विभागप्रमुख आहेत त्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. सावंत यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी असल्यामुळे पक्षप्रमुखांनी सावंत यांना उमेदवारी नाकारली असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. शिवसेना युवासेनेची सावंतांवर असलेली नाराजी उमेदवारी नाकारण्याची मुख्य कारण असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. सावंत यांच्या आमदारकीचा कार्यकाळ येत्या ७ जुलै रोजी संपत असल्याने त्यानंतर त्यांना मंत्रिपदावरून दूर व्हावे लागणार होते. मात्र आपल्याला पुन्हा उमेदवारी मिळाली नाही या रागातून सावंत यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याची चर्चा आहे. पक्षप्रमुखांनी राजीनामा स्वीकारला असला तरीही याबाबत पुढील सोपस्कार हे राजीनामा मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वीकारल्यानंतरच होणार आहेत.

Related posts

वाल्मिकी नगरमधील झोपड्यांच्या सर्वेक्षण काम सुरू करा- राज्यमंत्री रविंद्र वायकर

News Desk

हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत

News Desk

मी आमदारांनी भरलेल्या वर्गाचा मॉनिटर

News Desk
मुंबई

झाड कोसळून सातरस्ता येथे दोन गाड्यांचे नुकसान

swarit

मुंबई | मुंबईसह उपनगरात सोमवारी सायंकाळी पावसाच्या सरी बरसल्या. शनिवारी सायंकाळ पासून उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे परंतु सोमवारी मुंबईमध्ये लागबाग, परळ, दादर, वरळीसह शहरात पावसाने हजेरी लावली. सायन, हिंदमाता यांसारख्या काही ठिकाणी पहिल्याच पावसात पाणी गटार तुंबल्याचेही पहायला मिळाले.

तसेच सातरस्ता योथील केशव राव खाडे मार्ग येथे झाड कोसळून २ गाड्यांचे नुकसान झाले आहे. सोमवारी सायंकाळी ही घटना घडल्यानंतर सातरस्था पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करुन माहिती घेतली. झाड पडल्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस ,महानगरपालिकाचे कर्मचारी तातडीने पाऊस पडत असतानाही उपस्थित राहिले होते.

तसेच स्थानिक नागरिक व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखाअध्यक्ष मारूती दळवी यांनी वाहतूकीला अडथळा निर्माण होऊ नये म्हणून झाड जागेवरुन हटविण्यासाठी प्रयत्न केल्याचे माहिती मिळाली आहे.

Related posts

निवडणुक खर्चावर मर्यादा

News Desk

आरक्षणाचा विषय म्हणजे अशी आग, की त्यामुळे हात जळतील | रामदेव बाबा

News Desk

फेरीवाल्यांनी मनसे पदाधिका-यालाच झोडपले

News Desk