HW News Marathi
मुंबई

महापालिकेचे अजब तर्कट, त्या निवेदिकेचा मृत्यू वाऱ्यामुळे

मुंबईः चेंबूर येथे झाड पडून महिला ठार झाल्याच्या घटनेची जबाबदारी महापालिकेने झटकली आहे. वाऱ्यामुळे या महिलेच्या अंगावर झाड पडले असून त्याला पालिका जबाबदार नसल्याचे सांगत महापालिकेने या घटनेला वाऱ्यालाच जबाबदार धरले आहे. पालिकेच्या या अजब तर्कटामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

चेंबूर येथे राहणाऱ्या कांचन दास या २० जुलै रोजी योगा क्लास आटोपून स्वास्तिक पार्क येथील चंद्रोदय सोसायटीसमोरून जात असताना सोसायटीतलं नारळाचे झाडं अचानक त्यांच्या अंगावर कोसळले होते. त्यामुळे काही काळ त्या झाडाखाली दबल्या होत्या. जखमी झालेल्या कांचन यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात हलविण्यातही आलं होतं. पण तिथं उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे धोकादायक झाडांच्या प्रश्नांवरून महापालिकेविरोधात संताप व्यक्त केला जात होता. महापालिकेनेही या घटनेची गंभीर दखल घेऊन उद्यान विभागाला या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार उद्यान विभागाने अहवाल सादर केला असून वाऱ्यामुळे झाड कोसळून ही दुर्घटना झाली आहे. त्याला पालिका जबाबदार नाही, असं पालिकेने या अहवालात स्पष्ट केल्यानं आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

92 लाख दंड भरण्यास शासकीय अधिका-यांची चालढकल

News Desk

६ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आरेतील आग नियंत्रणात

News Desk

मांजरेकर कॉंग्रेसमध्ये जाणार का ?

News Desk