HW News Marathi
मुंबई

कर्जमाफीची नवी फॅशन आलीय – व्यंकय्या नायडू

मुंबई – आपल्या देशात अलीकडच्या काळात कर्ज घेतल्यानंतर लगेच कर्जमाफी करा, असं म्हणण्याची फॅशन आली आहे. बँकेतील पैसा हा जनतेचा आहे याच भान ठेवलं पाहिजे, अशी टीका केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी गुरुवारी केली. मात्र केवळ संकटकाळात कर्जमाफीच्या पर्यायाचा विचार केला जाऊ शकतो, असे नायडू असं कर्जमाफीचं समर्थनही त्यांनी केलं.

पुणे महापालिकेतर्फे उभारण्यात येत असलेल्या कर्जरोख्यांची नोंदणी गुरुवारी मुंबई शेअर बाजारात करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री अर्जुन गेहलोत, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, पालकमंत्री गिरीश बापट उपस्थित होते. कर्ज घेतले की लगेच कर्ज माफीची मागणी केली जात आहे. मात्र स्वावलंबी बनले पाहिजे. अमेरिकेने मोफत कर्ज दिले तर आपण घेणार का. आता मोफत देण्याचा जमाना गेला आहे. आता शहरात पायाभूत सुविधा प्रकल्प उभे करण्यासाठी शहरांनीच निधी उभा करणे आवश्यक आहे. पुणे महापालिकेने घेतलेल्या कर्जरोख्यांमुळे विकासाचा नवा मार्ग खुला झाला आहे, असं व्यकंय्या नायडू यांनी सांगितलं.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अॅड. उज्ज्वल निकम यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात

News Desk

MPSC च्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अभाविपचा पाठिंबा

Gauri Tilekar

चर्चच्या महिला प्रसाधनगृहात सीसीटीव्ही कॅमेरे

News Desk