HW News Marathi
मुंबई

१०० दिवस उलटले तरी मृतदेह जेजे रुग्णालयात

मुंबई | धारावी येथे २१ जुलैला सचिन जैसवाल वय १७ वर्ष मुलाचा मृत्य झाला होता. त्याचा मृत्यू हा पोलिसांनी केलेल्या मारहाणीतून झाला आहे, असा आरोप मृत मुलाच्या घरच्यांनी केला आहे. आज १०० दिवसापेक्षा अधिक दिवस होऊन गेले त्याचा मृतदेह जेजे रुग्णालयात पडून आहे.परंतु त्याचा घरच्यांनी अजुनही मृतदेह हाती घेतला नाही.कारण मुलाचा मृत्यू हा पोलिसांनी केलेल्या मारहाणीतुन झाला आहे व जो पर्यंत संबंधित पोलिसांवर कारवाई होत नाही तो पर्यंत मृतदेहाला हात लावणार नाही असे मृत सचिन जैस्वाल याचा घरच्यांनी सांगितले.

१२ जुलै रोजी मोबाईल चोरी प्रकरणी सचिन जैस्वाल याला संशयावरून ताब्यांत घेतले होते २२ तास चौकशी नंतर त्याला पोलिसांनी सोडल होते. त्यानंतर १३ जुलै रोजी त्याला ताप व अंगदुखी झाली तेव्हा शेजारचा दवाखान्यात नेले होते. १५ जुलै रोजी रक्ताची उलटी आल्यामुळे सायन रुग्णालयात पुन्हा दाखल केले तिथे अतिदक्षता विभागात ५ दिवस सचिनला ठेवण्यात आले आणि मग तेथेच त्याचा मृत्यु झाला .

पोलिसांनी २२ तास केलेल्या चौकशीत सचिनला पोलसानी बेदम मारले असं स्वतः ता त्याने घरी येताच घरच्यांना सांगितले होते.त्यामुळेच त्याला अंगदुखी व ताप आला होता. तो या गुन्ह्यात नसताना देखील त्याला संवषयावरून नेऊन विचारांना करून मारधाड केली त्यामुळे तो घाबरून आजारी पडला व त्याचा मृत्यू झाला असा दावा घरचे करत आहेत. परंतु डॉक्टरानी दिलेल्या रिपोर्ट मध्ये त्याला लॅपटो स्पायरेसिस झाल्याचे आढळले आहे. त्यानेच तो आजारी पडून मृत्यु झाला आहे असे पोलीस व डॉक्टरांकडून स्पष्ट झाले आहे.

परंतु जैस्वाल कुटुंबांचे म्हणणे असे आहे की आमचा मुलगा इतके दिवस ठणठणीत होता. पोलिसांनी केलेल्या मारहानीमुळे त्याची तब्यत खालावली आणि मृत्यू झाला. पोलिसांनी डॉक्टरांशी संपर्क करून हे खोटे रिपोर्ट बनवले आहेत. जर पोलिसांनी काही केलं नाही मग आम्ही त्यांचा विराधात इतक्या केलेल्या कॉम्प्लेइंट वरिष्ठ का ? नोंदवत नाहीत. या केस बद्दल पोलिसांची प्रतिक्रिया घ्यायला गेले असता कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

गोंधळामुळे लोकसभेचे कामकाज उद्यापर्यंत स्थगित

News Desk

व्हिसीला बडतर्फ केले मग व्हिटीला कधी- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची मागणी

News Desk

चर्चगट स्टेशनजवळ हॉर्डिंग कोसळून एका वृद्धाचा मृत्यू

News Desk
राजकारण

मुख्यमंत्री जलयुक्तवरील खर्च झालेल्या साडेसात हजार कोटींचा हिशोब द्या | धनंजय मुंडे

News Desk

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने महाराष्ट्रावर ओढवलेल्या भीषण दुष्काळाबाबत पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे बोलताना म्हणाले, जलयुक्त शिवार योजनेबाबत जलतज्ज्ञांनी हे तांत्रिकदृष्टया योग्य काम होत नसल्याचे आरोप केले होते. जीएसडीएने दिलेल्या २५२ तालुक्यातील १० हजार ५२१ गावांमधील अडीच मीटरने भूजल पातळी घटल्याचा अहवाल दिला आहे मग जलयुक्त शिवार कसे यशस्वी झाले. असा सवाल करतानाच यावर खर्च झालेल्या साडेसात हजार कोटी रुपयांचा हिशोब मुख्यमंत्र्यांनी दयावा अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली.

राज्यातील एकूण ७१ टक्के गावांमध्ये भूजल पातळीमध्ये लक्षणीय घट झाल्याचा मार्च २०१८ चा अहवाल सांगत असेल तर हा अहवाल जलयुक्त शिवार योजनेच्या अपयशावर व भ्रष्टाचारावर शिक्कामोर्तब होत आहे. मात्र जलयुक्त शिवार योजनेवर मुख्यमंत्र्यांना पत्रकारांनी प्रश्न केला तर लगेच राग येतो. मुख्यमंत्री जलयुक्तचे अपयश झाकण्यासाठी इमोशनल ब्लॅकमेल करत आहेत असा आरोपही धनंजय मुंडे यांनी केला. महाराष्ट्रातील भीषण दुष्काळाबाबत दोन महिन्यात चार पत्रे मुख्यमंत्र्यांना दुष्काळाची जाणीव करुन देण्यासाठी दिली आहेत.मात्र राज्यसरकारकेंद्राने निश्चित केलेला दुष्काळ सदृश्य संहिता स्थिती जाहीर करत आहे. अनेक दुष्काळी गावांवर अन्याय होणार आहे. शिवाय याचे नियमच शेतकरी विरोधी आहेत. या नियमामुळे राज्यातील अनेक तालुक्यातील गावामध्ये दुष्काळच जाहीर होणार नाही त्यामुळे सरकारी मदत शेतकऱ्यांना मिळणार नाही यामुळे या संहितेला विरोध असल्याचेही धनंजय मुंडे यांनी सांगितले.

दुष्काळाचे २०१६ चे निकष क्लिष्ट आहेत. त्याचे गणित आर्य भट्टला ही जमले नाहीतर तालुक्याच्या अधिकाऱ्यांना काय जमणार असा जबरदस्त टोलाही धनंजय मुंडे यांनी लगावला. या पत्रकार परिषदेला विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, प्रवक्ते क्लाईड क्रास्टो, विजय कोलते आणि संजय तटकरे उपस्थित होते.

Related posts

भाजपला मतदान करू नका, बॉलिवूडमधील ६०० दिग्गज कलाकारांचे आवाहन

News Desk

समीर भुजबळांना जामीन मंजूर

News Desk

शिवसेनेचे सर्व मंत्री भाजपला सामील, सेनेच्या आमदाराचा मंत्र्यांवर आरोप

News Desk