HW News Marathi
मुंबई

सिनेट निवडणूकीतील नोंदणीचे पन्नार हजार शुल्क मुंबई विद्यापीठाने लाटले

मुंबई: वेळेवर परीक्षेचे निकाल जाहीर करण्यात सपशेल अपयशी ठरलेल्या मुंबई विद्यापीठाने सिनेट निवडणुकीतील नोंदणीचे पन्नास हजार शुल्क लाटल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दिली आहे. मुंबई विद्यापीठाने नोंदणी केल्यानंतर सिनेटच्या निवडणूका राज्य शासनाने रद्द केल्या होत्या.

गलगली यांनी मुंबई विद्यापीठाकडे मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेच्या निवडणुकीसाठी २०१५ मध्ये पदवीधारकांच्या मतदार यादीत नावनोंदणी अंतर्गत प्राप्त झालेले अर्ज आणि एकूण शुल्काची माहिती विचारली होती. मुंबई विद्यापीठाचे उपकुलसचिव रविंद्र साळवे यांनी अनिल गलगली यांना माहिती दिली. अर्ज ‘अ’ अंतर्गत २५२१ आणि ‘ब’ अंतर्गत २४९२ असे एकूण ५०१३ अर्ज प्राप्त झाले होते. मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेवर १० सिनेट निवडणूका न झाल्याने जमा झालेले शुल्क परत केले नाही. अर्ज ‘अ’ हा नवीन मतदारांसाठी असून त्याचे शुल्क हे २० रुपये होते तर अर्ज ‘ब’ हा जुन्या मतदारांसाठी असून कोणतेही शुल्क नव्हते. याबाबतीत मुंबई विद्यापीठाच्या वित्त व लेखा विभागाने गलगली यांना माहिती दिली की, जुलै २०१५ रोजी ६८२० रुपये, आॅगस्ट २०१५ रोजी ४३३८० रुपये आणि सप्टेंबर २०१५ रोजी १२० असे एकूण पन्नास हजार रुपये जमा झाले. अनिल गलगली यांच्या मते निवडणूक रद्द करण्यात आल्या असतानाही मुंबई विद्यापीठाने आजपावेतो त्या मतदारांस त्यांचे शुल्क परत केले नाही आणि निवडणुकीच्या नावाने जमा झालेले नोंदणी शुल्क लाटण्याचा प्रकार केला आहे. तरी ते शुल्क प्रत्येक मतदारांस व्याजासकट देण्याची मागणी गलगली यांनी राज्यपाल विद्यासागर राव तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षण मंत्री विनोद तावडे, शिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांस पाठविलेल्या पत्रात केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

महाराष्ट्र दिनानिमित्त एमडीमध्ये उलघडला महाराष्ट्राचा इतिहास

News Desk

पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

News Desk

भाजपकडून जाहिरातबाजीवर 500 कोटींचा खर्च – नवाब मलिक

News Desk
Uncategorized

आता घाटी रुग्णालयात तीन बालकांचा मृत्यू

News Desk

औरंगाबाद-येथील घाटी रुग्णलायतील प्रसूती विभागात रविवारी रात्री तीन बालकांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी नातेवाईकांना गोरखपूर घटनेची आठवण झाली. मृत बेगमपुरा स्मशानभूमीत सोमवारी सकाळी सहा वाजता एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. ही विदारक घटना पाहून रोज सरणाची व्यवस्था करणाऱ्या स्मशानजोगीच्याही डोळ्यात पाणी आले.

रविवारी मृत्युमुखी पडलेल्या तीन बालकांत दोन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. माया मुकेश मगरे (३०, रा. ब्रिजवाडी), पूजा पांडुरंग बखले (रा. डोंगरगाव, ता. अंबड), अर्चना विनायक मुंढे (३०, रा. धावणी मोहल्ला) अशी मृत्युमुखी पडलेल्या नवजात शिशूंच्या आईची नावे आहेत. विनायक मुंढे (३६) त्याची पत्नी अर्चना हिला रविवारी सातच्या सुमारास अचानक कळा येऊ लागल्या. त्याने तिला तत्काळ घाटीतील प्रसूती विभागात दाखल केले. सात वाजून ४० मिनिटांनी अर्चना प्रसूत झाली. मात्र मुलगा झाला आहे की मुलगी हे त्याला कोणीच सांगितले नाही. पुरुषांना प्रसूती विभागात प्रवेश नसल्यामुळे त्याला बाहेरच थांबावे लागले. अखेर सकाळी सहा वाजता विनायकच्या हातात मृत बाळ ठेवण्यात आले. माझ्या बाळाचा मृत्यू कशामुळे झाला? असे तो घाटीतील कर्मचाऱ्यांना विचारत होता. मात्र, त्याला उत्तर मिळाले नाही. काही मुले जन्मल्यानंतर केवळ पंधार मिनिटे जगतात, असे डॉक्टरांनी सांगितले.

Related posts

चर्नी रोड स्थानक पूल दुरुस्तीपर्यंत तात्पुरती तिकीट खिडकी तातडीने सुरु करावी! – पालकमंत्री दीपक केसरकर

Aprna

गुजरात विधानसभेसाठी भाजपची 70 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

News Desk

घाणीचे साम्राज्य नष्ट; Navi Mumbai मध्ये उभारले उड्डाणपुलाखाली Sports Complex

Chetan Kirdat