HW News Marathi
मुंबई

दहिकाला तीन गोविंदांच्या जीवावर!

मुंबई : उच्च न्यायालयाने थरांच्या उंचीवरील मर्यादा हटविल्यामुळे काल मुंबई- ठाण्यासह राज्यभरात दहिकाला उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. पण सुरक्षेसंदर्भातील नियम धाब्यावर बसविल्यामुळे काही ठिकाणी या उत्सवाला गालबोट लागले आहे. कालचा दहिहंडी उत्सव तीन गोविंदांच्या जीवावर बेतला, तर मुंबई परिसरात ११७ गोविंदा काल जखमी झाले.

नवी मुंबईतील ऐरोली येथे सुनील चौगुले स्पोर्टस असोसिएशनच्या सार्वजनिक दहीहंडी उत्सवात जयेश साईनाथ तारले (३०) या गोविदांचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला. तसेचपालघरमधील धनसार गावात रोहन गोपीनाथ किणी (२१) या गोविंदाचा दहीहंडी फोडताना पडून जागीच मृत्यू झाला. त्याचबरोबर पुण्यात दहीहंडी फोडून दुचाकीने घरी जात असताना हृदयविकाराचा झटका येऊन एका गोविंदाचा मृत्यू झाला. दरम्यान, मुंबई परिसरात काल ११७ गोविंदा जखमी झाले.त्यापैकी तीन गंभीर जखमींना केईएम, नायर आणि सिद्धार्थ रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.

न्यायालयाने बंदी घातली असतानाही कालच्या उत्सवात अनेक ठिकाणी बालगोंविदा थर लावताना दिसून आले. तसेच अनेक बालगोविंदा सेफ्टीबेल्ट, डोक्यावर हेल्मेट न घालताच थरांवर चढत होते. प्रशासनक मात्र याबाबत मूग गिळून गप्प होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मोबाइल चार्जिंगला लावून बोलणे जीवावर बेतले

News Desk

अनधिकृत बांधकामवर कारवाई करण्यात पालिका अपयशी

News Desk

अंधेरीतील सरिता इमारतीत घरगुती सिलेंडरचा स्फोट, २ जण जखमी

News Desk
देश / विदेश

जलप्रलयातही देशप्रेम अबाधित!

News Desk

गुवाहाटी : दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत काल झालेले स्वातंत्र्यदिनाचे दिमाखदार कार्यक्रम आपण पाहिले. मात्र आसाममधील लहानशा शाळेसारखा सोहळा काल कुठेही झाला नसेल. पूरपरिस्थितीने वेढलेल्या आसाममध्ये चक्क गुडघाभर पाण्यात उभे राहून शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी ध्वजारोहण आणि ध्वजवंदन केले. जलप्रलयातही अबाधित राहिलेले हे देशप्रेम सध्या सोशल मिडियावर कौतुकाचा विषय ठरत आहे.

आसाममधील ढुबरी जिल्ह्यात फकीरगंज पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या नसकारा सरकारी शाळेतील हे छायाचित्र असून येथील सहायक शिक्षक मिजानूर रहमान यांनी त्यांच्या फेसबुक प्रोफाइलवर टाकल्यानंतर काही तासांतच ते तब्बल ६० हजार जणांनी शेअर केले. सोशल मिडियावर मिळालेल्या या प्रतिसादाबद्दल रहमान यांनी देशवासियांचे आभार मानले आहेत. या निमित्ताने आसामसारख्या दुर्गम भागातील समस्यांना वाचा फुटल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. ‘आम्हाला पायाभूत सुविधांपासूनही वंचित राहावे लागते. वीजेची समस्याही मोठी आहे. हा फोटो शेअर केल्यानंतर लगेचच माझ्या मोबाइलची बॅटरी संपली आणि चार्ज करायला वीजही नव्हती. रस्ते आणि दळणवळणाच्या अन्य सुविधाही येथे आवश्यक प्रमाणात उपलब्ध नाहीत. याकडे शासनाने लक्ष पुरवावे,’ असे रहमान यांनी म्हटले आहे.

Related posts

#NirbhayaCase : पुढील आदेशापर्यंत दोषींच्या फाशीला स्थगिती

swarit

शशिकलाचीही सुटका होणार

News Desk

जाणून घ्या…का साजरा केला जातो मानवाधिकार दिवस

News Desk