HW News Marathi
मुंबई

परिवहन मंत्री राजीनामा द्या,एसटी संपातील वाहकाचा मृत्यू हा सरकारच्या दडपशाहीचा बळी!: विखे पाटील

मुंबई,एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात अहमदनगर जिल्ह्यातील वाहक एकनाथ वाकचौरे यांचा मृत्यू हा सरकारच्या दडपशाहीने घेतलेला बळी असल्याची संतप्त प्रतिक्रया विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे. सरकारने या आंदोलनावर सामोपचाराने तोडगा काढून एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रूजू करून घ्यायला हवे होते आणि प्रवाशांना दिलासा मिळवून द्यायला हवा होता.

त्याऐवजी परिवहन मंत्री कर्मचाऱ्यांना जेलमध्ये डांबण्याच्या व निलंबित करण्याच्या धमक्या देत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन हाताळण्यात सरकार आणि प्रामुख्याने परिवहन मंत्री पूर्णतः अपयशी ठरले आहेत. सरकारच्या अपरिपक्वतेमुळे एकिकडे एसटी कर्मचारी उग्र झाले असून, दुसरीकडे प्रवाशांना दिवाळीला घरी जाण्यासाठी खासगी वाहनांचे अव्वाच्या सव्वा भाडे मोजावे लागले आहे. या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून परिवहन मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, असेही विखे पाटील यावेळी म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

वरिष्ठांनी झापले म्हणून कर्मचा-याने घेतला गळफास

News Desk

६ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आरेतील आग नियंत्रणात

News Desk

Dahi Handi | नयन फाउंडेशनच्या गोविंदांची आयडीयलच्या दहीहंडीला सलामी

News Desk
महाराष्ट्र

एसटी संपाचा तिढा कायम

News Desk

मुंबई- एसटी संपाचा तिढा आज तिस-या दिवशीही कायम असून तो सुटण्याची लक्षणे दिसत नाही. एसटी कामगाार संघटना आपल्या पगार वाढीच्या मागणीवर ठाम आहे. तर सरकार मर्यादीत पगारवाढ देण्यास तयार आहे. ते मात्र एसटी संघटऩेला मान्य नाही.

कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग हवाच अशी भूमिकाही संघटनेनं घेतली आहे. त्यामुळे आजही हा संप सुरू आहे.

4 हजार ते 7 हजार ची पगारवाढ प्रशासनाने मान्य केलीय.पण हा प्रस्ताव आम्हाला मान्य नाही असे संघटनेनं स्पष्ट केले.

शासनाने 2.57 हजार कोटीची वाढ देण्याच मान्य केलंय. पण आम्हाला साडे 4 हजार कोटींची वाढ अपेक्षीत आहे

दरम्यान जे जास्तीत जास्त वेतनवाढ देणं शक्य होती ती ऑफर केल्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी स्पष्ट केले.

पण संघटनाच समाधान होत नाही. त्यामुळे बोलणी करण शक्य नाही. जी पगारवाढ दिली आहे ती गेल्या 77 वर्षातली सर्वात मोठी पगारवाढ असल्याचा दावा रावते यांनी केला. आता प्रशासन आणि कामगार संघटनेच्या वादात प्रवाशांचे नाहक हाल होत आहेत.

Related posts

सर्व माध्यमात दहावीपर्यंत मराठी विषय सक्तीचा, शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय!

News Desk

राज्यसभेसाठी उमेदवारी न मिळाल्यामुळे काँग्रेसच्या ‘या’ नेत्याने दिला प्रदेश महासचिवपदाचा राजीनामा

Aprna

मर्दानगीच्या पोकळ भाषेपेक्षा नामांतर करुन खरी मर्दानगी दाखवा, तुषार भोसलेंचं मुख्यमंत्र्यांना आव्हान

News Desk