HW News Marathi
मुंबई

स्वातंत्र्यदिनी मुंबईत ‘अल्ट्रा रन’

मुंबई । येत्या स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट रोजी ‘मुंबई अल्ट्रा -१२ तास रन’च्या पाचव्या पर्वामध्ये सुमारे पाचशे स्पर्धक आणि त्यांना उत्तेजन देण्यासाठी दोन हजार समर्थक धावणार आहेत. जे धावूच शकत नाहीत, त्यांनी किमान १२ मिनिटे तरी धावावे, यासाठी ‘वेलनेस ओव्हर इलनेस ’ हा संदेश यानिमित्ताने देण्यात येणार आहे. ऐंशी वर्षांचे डॉ. पी. एस्. रमाणी हे या ‘रन’चे ब्रॅण्ड अम्बेसेडर असून ते स्वत: १२ तास धावणार आहेत.

धावण्याच्या या कालावधीत धावपटूंना त्यांच्या गरजेनुसार खाण्यापिण्याची आणि काही काळ विश्रांती घेण्याची देखील मुभा राहणार आहे. १२ तासांचे हे अंतर ४२.२ किलोमीटरचे आहे. शिवाजी पार्क येथून पहाटे पाच वाजल्यापासून सुरू होणार्‍या या मॅरेथॉन रनचा सायंकाळी पाच वाजता समारोप अपेक्षित आहे. स्पर्धा पूर्ण करणार्‍या प्रत्येकाला पदक देण्यात येणार आहे. धावपटूंना आवश्यकता भासल्यास उपाचारासाठी धावण्याच्या मार्गांवर तज्ज्ञ डॉक्टर आणि १०८ रुग्णवाहिकाही असणार आहेत.

‘एडलवाइज ग्रुप’चे पाठबळ लाभलेल्या या स्पर्धेतील प्रवेश शुल्काचा निधी कर्करोगग्रस्तांवर उपचार करर्‍यासाठी टाटा मेमोरियल रुग्णालयाला देण्यात येणार असल्याचे ‘मुंबई अल्ट्रा -१२ तास रन’चे संचालक सॅविओ डिसोझा यांनी सांगितले. रेसच्या वैद्यकीय संचालिका गायत्री ठाकूर यांनी सांगितले की, धावण्याच्या वेळी एखाद्याला थकवा जाणवल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना स्पर्धेतून माघार घेणे बंधनकारक राहील. यावेळी उषा सोनम यांनी धावण्याऐवजी चालत का होईना, पण स्पर्धा पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अनधिकृत बांधकामवर कारवाई करण्यात पालिका अपयशी

News Desk

बेस्ट चालकाला बस चालवताना आला हृदयविकाराचा झटका

News Desk

छगन भुजबळांच्या प्रकृतीची विधानपरिषद सभागृहात चिंता योग्य उपचार करण्याची धनंजय मुंडे यांची मागणी

News Desk
मुंबई

फेरीवाल्यांना हटवा, राज यांचे आयुक्तांना निवेदन

News Desk

मुंबई: राज ठाकरे यांनी बुधवारी महापालिका आयुकत्त अजय मेहता यांची भेट घेऊन रस्त्यांवरून फेरीवाल्यांना त्वरीत हटवण्यासंदर्भात निवेदन सादर केले. यावेळी राज यांनी रेल्वे पूल आणि फुटपाथवरून चालणा-या लोकांच्या समस्याही त्यांच्यापुढे मांडल्या. या निवेदनात राज यांनी फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासंदभार्तील अनेक मुद्देही उपस्थित केले आहेत.

या समस्येवर कायमचा तोडगा काढण्यासाठी आयुक्तांनी पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांशी चर्चा करावी. जेणेकरून तिन्ही यंत्रणांच्या समन्वयातून ठोस पावले उचलली जातील. मनसेच्या संताप मोचार्नंतर बहुतांश रेल्वे स्थानकांच्या परिसरातील फेरीवाल्यांना हटवण्यात आले आहे. मात्र, हे सगळे किती दिवस टिकेल, असा प्रश्नही लोकांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे लोकांना यासंदर्भात तक्रारी करण्यासाठी पालिकेने व्हॉटसअ‍ॅप क्रमांक उपलब्ध करून द्यावेत. फेरीवाले बसतात त्या परिसरात हे व्हॉटसअ‍ॅप क्रमांक असलेले फलक पालिकेने लावावेत. जेणेकरून प्रवाशांना त्यांच्या परिसरात फेरीवाल्यांकडून होणाºया अतिक्रमणाचे फोटो पाठवता येतील.

Related posts

हे आहेत यंदाच्या नवरात्रीचे ९ रंग

News Desk

‘जय राजस्थान’ चा नारा देणाऱ्या मुख्यमंत्र्यांना मनसे स्मरणशक्तीचे पुस्तके पाठवणार

News Desk

भांडुपमध्ये सार्वजनिक शौचालय खचले, दोन जणांचा मृत्यू

swarit