HW News Marathi
मुंबई

दारू बंदीच्या विषयावरून विधानसभेत गदारोळ

मुंबई | गावात दारूबंदी करण्यासाठी घालण्यात आलेल्या जाचक अटी रद्द करण्यात यावी या मागणीसाठी आज विधानसभेत गदारोळ घालण्यात आला.

दारू बंदीच्या संदर्भात निवडणूक घेण्याच्या बाबतीत जो आदेश देण्यात आलेला तो आदेश असंवैधानिक असून बाटली आडवी करण्याचे जे नियम आहेत ते रद्द करण्यात यावेत या मागणीसाठी सत्ताधारी भाजपच्या आमदारासह विरोधी पक्षातील आमदारांनी वेल मध्ये उतरून घोषणाबाजी केली. गावात दारूबंदी करण्यासाठी गावातील एकूण महिलांच्या ५० टक्क्यापेक्षा जास्त महिलांनी मतदान करून आडव्या बाटलीला मतदान केले तरच गावातील दारू बंदी केली जाते.

शासनाच्या वतीने काढण्यात आलेला हा आदेश असंवैधानिक असून देशात अशी कोणतीच निवडणूक होत नसल्याचा आरोप भाजपाचे आशिष शेलार, अनिल बोंडे, योगेश सागर यांनी उपस्थित केला. झालेल्या मतदानांपैकी ज्या उमेदवाराला सर्वाधिक मते पडतात तो विजयी म्हणून गृहीत धरले जाते मात्र दारू बंदी करण्यासाठी गावातील एकूण महिला मतदारांच्या ५० टक्के महिलांनी दर दारू बंदीसाठी आडव्या बाटलीला मतदान केले तरच गावातील दारू बंद करण्याचा नियम आहे.

यामध्ये एकूण मतदाना ऐवजी वैध मतदानाचा नियम ठेवावा अशी मागणी कऱण्यात आली. आदेशात बदल करता येणार नाही – बावनकुळे राज्यात दारू बंदी करण्यासाठी जो आदेश काढण्यात आलेला आहे त्यामध्ये तात्काळ बदल करता येणे शक्य नाही. १९४९ च्या दारूबंदी कायद्यानुसार सगळे कामे केले जातात. त्यामुळे दारू बंदीसाठीच्या या आदेशात कोणताही बदल केला जाणार नसल्याची भूमिका मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात घेतली.

बावनकुळे यांनी ही भूमिका घेतल्यावर भाजपाचेच आमदारांनी आक्षेप घेत घोषणाबाजी करायला सुरूवात केली. दारू बंदीच्या संदर्भात जो आदेश दिलेला आहे तो तात्काळ रद्द करण्याची मागणी लावून धरली. यावेळी वेळ मारून नेण्यासाठी येत्या तीन महिन्यात यावर निर्णय घेण्यात येईल असे सांगितले गेले. मात्र त्यावरही सदस्यांचे समाधान न झाल्यामुळे गोंधळ सुरूच राहिला आणि या गोंधळातच तालिका अध्यक्षांनी लक्षवेधीचा तास संपल्याचे जाहीर केले.

दारू बंदीसाठी काय आहेत नियम एखाद्या गावात किंवा नगर पालिका क्षेत्रात जर दारूबंदी करायची असेल तर त्या भागातील असलेल्या एकूण महिला मतदारापैकी ५० टक्केपेक्षा जास्त महिला मतदारांनी जर आडव्या बाटलीच्या बाजूने मतदान केले तर गावातील दारूबंदी केली जाते. या नियम तयार करत असतांना एकूण महिला मतदार असे गृहित धरले जाते. राज्यात आणि देशात आतापर्यंत कोणत्याही निवडणूकीमध्ये असा नियम नाही. झालेल्या मतदानापैकी असे गृहीत झालेले आहे. मात्र दारू बंदीच्या मतदानात मतदार यादीत असलेल्या एकूण महिला मतदारापैकी ५१ टक्के महिलांनी आडव्या बाटलीला मतदान करणे हा नियम ठेवण्यात आलेला आहे. यामध्ये मयत किंवा गावात न राहणाऱ्या महिलांची नांवे देखील मतदार यादीत असतात.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईसह महाराष्ट्रात झालेला हिंसाचार लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी घेतला निर्णय

News Desk

…मात्र राज्य सरकार गप्प का ? संजय राऊतांचा रोखठोक सवाल

News Desk

केईम रुग्णालय परिसरातील उघडेबाबावर कारवाई होणार ?

News Desk