HW News Marathi
मुंबई

… आता उद्धव ठाकरेंची संपत्ती जाहीर करणार का? – भाजप

माधव भांडारी, प्रवक्ते भाजप किरीट सोमय्या, खासदार भाजप

मुंबई – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी 2007 मध्ये 5 कोटी 57 लाख एवढी संपत्ती दाखवली होती, तर 2012 च्या विधानसभेला 11 कोटी 77 लाख दाखवली आहे, आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची संपत्ती जाहीर करा, अशी मागणी भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी केली आहे.

अमित शाहांची संपत्ती अगोदर जाहीर करावी, त्यानंतर ठाकरे कुटुंबियांच्या संपत्तीबद्दल बोलावं, असं शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे म्हणाले होते. त्यानंतर भाजपकडून अमित शाहांच्या संपत्तीचं प्रतिज्ञापत्र दाखवण्यात आलं. ठाकरे कुटुंबाची सात बोगस कंपन्यांमध्ये गुंतवणूक असल्याचा आरोप भाजप खासदार किरीट सोमय्यांनी केला होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मुंबईतील कालच्या सभेत उद्धव ठाकरे त्यांची संपत्ती जाहीर करणार का, असा सवाल विचारला होता.

याबाबत शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन भाजपचे आरोप फेटाळले. दरम्यान किरीट सोमय्यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला आहे. अमित शाहांची संपत्ती दाखवली, आता तुमची दाखवा, त्या सात कंपन्यांसोबतचे आर्थिक व्यवहार समोर येण्याची भीती आहे का, असा सवाल सोमय्यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

जाणून घ्या…कसे आहे व्हॉट्सअॅपचे नवे फिचर

News Desk

Raj Thackeray ED : मरिन ड्राईव्ह, दादर, आझाद मैदानासह ईडी कार्यालयाबाहेर जमाव बंदी

News Desk

आजपासून मुंबईतील सेंट्रल रेल्वे मार्गावर धावणार एसी लोकल!

News Desk
मुंबई

भाजपा उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करत विकासाच्‍या बाजूने कौल द्यावा :सुधीर मुनगंटीवार

News Desk

मुंबई केंद्रातील व राज्‍यातील भाजपा सरकारने घेतलेले लोकहिताचे विविध निर्णय, शेतक-यांसाठी राबविलेल्‍या कल्‍याणकारी योजना व ग्रामीण भागाच्‍या विकासाला चालना देण्‍याच्‍या दृष्‍टीने घेतलेला पुढाकार लक्षात घेता ग्रामीण भागाच्‍या सर्वांगिण विकासासाठी भारतीय जनता पार्टी हा एकमेव पर्याय असल्‍याचे सिध्‍द झाले आहे. जिल्‍हा परिषद आणि पंचायत समितीच्‍या निवडणूकीत भारतीय जनता पार्टीच्‍या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करत विकासाच्‍या बाजूने कौल द्यावा असे आवाहन राज्‍याचे वित्‍त, नियोजन आणि वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

राज्‍य सरकारने ओबीसी, विमुक्‍त जाती, भटक्‍या जमाती व विशेष मागास प्रवर्गासाठी स्‍वतंत्र विभाग निर्माण केला असुन ईबीसी सवलतीच्‍या वार्षीक उत्‍पन्‍न मर्यादेत ऐतिहासिक वाढ केली आहे. जलयुक्‍त शिवार योजनेत 500 कोटी रूपयांच्‍या लोकसहभागाची नोंद झाली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्‍या माध्‍यमातुन शेतक-यांना मदतीचा हात भाजपा सरकारने दिला आहे. राज्‍यातील 1 कोटी 06 लाख शेतकरी या योजनेत सहभागी झाले असुन ही संख्‍या देशात सर्वाधिक आहे. वन्‍यप्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यात मृत पावलेल्‍या व्‍यक्‍तींच्‍या कुटूंबियांना देण्‍यात येणा-या मदतीत वाढ करून आता 5 लाखाऐवजी 8 लाख रूपये मृतांच्‍या कुटूंबियांना देण्‍याचा निर्णय राज्‍य सरकारने घेतला आहे. आदिवासी आश्रमशाळांमध्‍ये ई-लर्निंग, अनुसुचित जमातीच्‍या 10 विद्यार्थ्‍यांना दरवर्षी विदेशात उच्‍चशिक्षण देण्‍याचा निर्णय, राज्‍यातील सोयाबीन उत्‍पादक शेतक-यांना प्रती क्विंटल 200 रू. अनुदान मंजूर करण्‍याचा निर्णय, धान उत्‍पादक शेतक-यांना 200 रू. प्रोत्‍साहन पर राशी मंजूर करण्‍याचा निर्णय असे शेतक-यांच्‍या तसेच सर्वसामान्‍य जनतेच्‍या हिताचे निर्णय घेत भाजपा सरकारने राज्‍याला प्रगतीपथावर नेले आहे. चंद्रपूर जिल्‍हयात शासकीय वैद्यकिय महाविद्यालय रूग्‍णालयाची स्‍थापना, चंद्रपूर-बल्‍लारपूर मार्गावर सैनिकी शाळा, देशातील अत्‍याधुनिक बॉटनिकल गार्डनची निर्मीती, बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्र असे अनेक विकासाचे टप्‍पे जिल्‍हयातील नागरिकांना अनुभवायला देत ताडोबा अंधारी व्‍याघ्र प्रकल्‍पाला आंतरराष्‍ट्रीय दर्जाचे पर्यटन स्‍थळ करण्‍याचा निर्णय राज्‍य सरकारने घेतला आहे. केंद्रात आणि राज्‍यात भाजपाचे सरकार आहे त्‍यामुळे जिल्‍हा परिषदा आणि पंचायत समित्‍यांमध्‍ये भाजपाची सत्‍ता आल्‍यास विकासाची गाडी अधीक वेगाने धावेल. विकासाच्‍या या गाडीचा वेग अधीक वाढविण्‍यासाठी आपले मत भारतीय जनता पार्टीला देण्‍याचे आवाहन वित्‍तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे…

Related posts

चेंगराचेंरीत मृत झालेला तरूण जीवंत

News Desk

सीएसएमटी जवळील ‘हिमालय’ पादचारी पूल कोसळून ६ जणांचा मृत्यू

News Desk

श्रावणी सोमवारी मुंबईतील या मंदिरांमध्ये होते भाविकांची गर्दी…

News Desk