HW News Marathi
मुंबई

मराठा आंदोलनात फूट पाडल्याचा आरोप राजकीय हेतूने

भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांचे प्रतिपादन

मुंबई, भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी मराठा मोर्चा आंदोलनात फूट पाडल्याचा आरोप निखालस खोटा व राजकीय हेतूने प्रेरित आहे. महापालिका – जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाला यश मिळणार असल्याचे दिसू लागल्यानंतर काहीजणांनी वैफल्यापोटी हा आरोप केला आहे. भाजपाने मराठा समाजाच्या आंदोलनाबद्दल पाठिंब्याची भूमिका घेतली असून राज्य सरकारनेही समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले आहेत, असे भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी बुधवारी सांगितले.

माधव भांडारी म्हणाले की, भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे, महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, शिक्षणमंत्री विनोद तावडे व मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांच्यावर आंदोलनात फूट पाडण्याचा केलेला आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. भाजपा हा आरोप स्पष्टपणे फेटाळत आहे. या आंदोलनात कोणतेही राजकारण आणू नये, अशी भाजपाची भूमिका आहे.

त्यांनी सांगितले की, मोर्चाच्या निमित्ताने मराठा समाजाच्या समस्या ठोसपणे मांडल्या गेल्या व भाजपाने त्याची दखल घेतली. प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या प्रदेश कार्यकारणी बैठकीत मराठा समाजाविषयीचा ठराव मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी मांडला व तो एकमताने मंजूर झाला. मा. प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे स्वतः मराठा समाजाच्या मोर्चात सहभागी झाले. भाजपाच्या राज्य सरकारने समाजाच्या मागण्यांची दखल घेऊन तातडीने पावले टाकली. भाजपा सरकारने सत्तेवर आल्यावर दोन महिन्यात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कायदा केला तसेच न्यायालयात हे आरक्षण टिकावे यासाठी चांगल्या रितीने पाठपुरावा सुरू आहे. राज्य सरकारने सुरू केलेल्या राजर्षी शाहू शिष्यवृत्ती योजनेमुळे समाजाच्या सर्व होतकरू विद्यार्थ्यांना मदत होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

कोरोनाग्रस्तांच्या संख्येनुसार आरोग्य विभागाकडे पुरेशी संसाधने उपलब्ध

News Desk

रविवारी हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही, प्रवाशांमध्ये उत्साह

swarit

बालमोहन शाळेची गुरुपौर्णिमा 

swarit
मुंबई

भाजपा उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करत विकासाच्‍या बाजूने कौल द्यावा :सुधीर मुनगंटीवार

News Desk

मुंबई केंद्रातील व राज्‍यातील भाजपा सरकारने घेतलेले लोकहिताचे विविध निर्णय, शेतक-यांसाठी राबविलेल्‍या कल्‍याणकारी योजना व ग्रामीण भागाच्‍या विकासाला चालना देण्‍याच्‍या दृष्‍टीने घेतलेला पुढाकार लक्षात घेता ग्रामीण भागाच्‍या सर्वांगिण विकासासाठी भारतीय जनता पार्टी हा एकमेव पर्याय असल्‍याचे सिध्‍द झाले आहे. जिल्‍हा परिषद आणि पंचायत समितीच्‍या निवडणूकीत भारतीय जनता पार्टीच्‍या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करत विकासाच्‍या बाजूने कौल द्यावा असे आवाहन राज्‍याचे वित्‍त, नियोजन आणि वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

राज्‍य सरकारने ओबीसी, विमुक्‍त जाती, भटक्‍या जमाती व विशेष मागास प्रवर्गासाठी स्‍वतंत्र विभाग निर्माण केला असुन ईबीसी सवलतीच्‍या वार्षीक उत्‍पन्‍न मर्यादेत ऐतिहासिक वाढ केली आहे. जलयुक्‍त शिवार योजनेत 500 कोटी रूपयांच्‍या लोकसहभागाची नोंद झाली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्‍या माध्‍यमातुन शेतक-यांना मदतीचा हात भाजपा सरकारने दिला आहे. राज्‍यातील 1 कोटी 06 लाख शेतकरी या योजनेत सहभागी झाले असुन ही संख्‍या देशात सर्वाधिक आहे. वन्‍यप्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यात मृत पावलेल्‍या व्‍यक्‍तींच्‍या कुटूंबियांना देण्‍यात येणा-या मदतीत वाढ करून आता 5 लाखाऐवजी 8 लाख रूपये मृतांच्‍या कुटूंबियांना देण्‍याचा निर्णय राज्‍य सरकारने घेतला आहे. आदिवासी आश्रमशाळांमध्‍ये ई-लर्निंग, अनुसुचित जमातीच्‍या 10 विद्यार्थ्‍यांना दरवर्षी विदेशात उच्‍चशिक्षण देण्‍याचा निर्णय, राज्‍यातील सोयाबीन उत्‍पादक शेतक-यांना प्रती क्विंटल 200 रू. अनुदान मंजूर करण्‍याचा निर्णय, धान उत्‍पादक शेतक-यांना 200 रू. प्रोत्‍साहन पर राशी मंजूर करण्‍याचा निर्णय असे शेतक-यांच्‍या तसेच सर्वसामान्‍य जनतेच्‍या हिताचे निर्णय घेत भाजपा सरकारने राज्‍याला प्रगतीपथावर नेले आहे. चंद्रपूर जिल्‍हयात शासकीय वैद्यकिय महाविद्यालय रूग्‍णालयाची स्‍थापना, चंद्रपूर-बल्‍लारपूर मार्गावर सैनिकी शाळा, देशातील अत्‍याधुनिक बॉटनिकल गार्डनची निर्मीती, बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्र असे अनेक विकासाचे टप्‍पे जिल्‍हयातील नागरिकांना अनुभवायला देत ताडोबा अंधारी व्‍याघ्र प्रकल्‍पाला आंतरराष्‍ट्रीय दर्जाचे पर्यटन स्‍थळ करण्‍याचा निर्णय राज्‍य सरकारने घेतला आहे. केंद्रात आणि राज्‍यात भाजपाचे सरकार आहे त्‍यामुळे जिल्‍हा परिषदा आणि पंचायत समित्‍यांमध्‍ये भाजपाची सत्‍ता आल्‍यास विकासाची गाडी अधीक वेगाने धावेल. विकासाच्‍या या गाडीचा वेग अधीक वाढविण्‍यासाठी आपले मत भारतीय जनता पार्टीला देण्‍याचे आवाहन वित्‍तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे…

Related posts

चेंगराचेंरीत मृत झालेला तरूण जीवंत

News Desk

सीएसएमटी जवळील ‘हिमालय’ पादचारी पूल कोसळून ६ जणांचा मृत्यू

News Desk

श्रावणी सोमवारी मुंबईतील या मंदिरांमध्ये होते भाविकांची गर्दी…

News Desk