HW News Marathi
मुंबई

मराठा आंदोलनात फूट पाडल्याचा आरोप राजकीय हेतूने

भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांचे प्रतिपादन

मुंबई, भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी मराठा मोर्चा आंदोलनात फूट पाडल्याचा आरोप निखालस खोटा व राजकीय हेतूने प्रेरित आहे. महापालिका – जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाला यश मिळणार असल्याचे दिसू लागल्यानंतर काहीजणांनी वैफल्यापोटी हा आरोप केला आहे. भाजपाने मराठा समाजाच्या आंदोलनाबद्दल पाठिंब्याची भूमिका घेतली असून राज्य सरकारनेही समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले आहेत, असे भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी बुधवारी सांगितले.

माधव भांडारी म्हणाले की, भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे, महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, शिक्षणमंत्री विनोद तावडे व मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांच्यावर आंदोलनात फूट पाडण्याचा केलेला आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. भाजपा हा आरोप स्पष्टपणे फेटाळत आहे. या आंदोलनात कोणतेही राजकारण आणू नये, अशी भाजपाची भूमिका आहे.

त्यांनी सांगितले की, मोर्चाच्या निमित्ताने मराठा समाजाच्या समस्या ठोसपणे मांडल्या गेल्या व भाजपाने त्याची दखल घेतली. प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या प्रदेश कार्यकारणी बैठकीत मराठा समाजाविषयीचा ठराव मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी मांडला व तो एकमताने मंजूर झाला. मा. प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे स्वतः मराठा समाजाच्या मोर्चात सहभागी झाले. भाजपाच्या राज्य सरकारने समाजाच्या मागण्यांची दखल घेऊन तातडीने पावले टाकली. भाजपा सरकारने सत्तेवर आल्यावर दोन महिन्यात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कायदा केला तसेच न्यायालयात हे आरक्षण टिकावे यासाठी चांगल्या रितीने पाठपुरावा सुरू आहे. राज्य सरकारने सुरू केलेल्या राजर्षी शाहू शिष्यवृत्ती योजनेमुळे समाजाच्या सर्व होतकरू विद्यार्थ्यांना मदत होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईमध्ये “माणदेशी महोत्सव” ३ जानेवारीला

News Desk

उच्च न्यायालयाने कालाघोडा फेस्टिव्हलला परवानगी

News Desk

मुलुंड-ऐरोली टोलनाक्यांवरील टोल वसुली महिन्याभरासाठी बंद

swarit