HW News Marathi
मुंबई

वाशिंद स्थानकात संतप्त प्रवाशांचा रेले रोको!

मुंबई आसनगाव स्थानकाजवळ मंगळवारी दुरांतो एक्सप्रेस घसरून झालेल्या अपघातानंतर टिटवाळा-आसनगाव लोकलसेवा बंद आहे.तब्बल ७२ तास उलटूनही सेवा ठप्प असल्याने शुक्रवारी सकाळी प्रवाशांचा उद्रेक झाला. संतप्त प्रवाशांनी वाशिंद स्थानकात रेलरोको केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत जमावाला शांत केल्याने परिस्थिती आटोक्यात राहिली.

वाशिंद स्थानकात संतप्त प्रवाशांनी दादर-अमृतसर एक्सप्रेस तब्बल ३५ मिनिटं रोखून धरली होती. तीन दिवसांपासून बंद असलेली सेवा पूर्वपदावर यायला आणखी आठ दिवस लागतील, असं रेल्वेकडून सांगण्यात आल्याने या आंदोलनाचा भडका उडाल्याचे कळते.

सध्या कसारा ते टिटवाळा हा मार्ग बंद असला तरी टिटवाळ्याहून कसाराकडे जाणारा मार्ग सुरु आहे. या मार्गावर लांब पल्ल्याच्या गाड्या सोडल्या जात असून प्रवाशांच्या सोयीसाठी या एक्सप्रेसना प्रत्येक स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. मात्र मुंबईकडे येण्यासाठी पर्याय नसल्याने प्रवाशांमध्ये असंतोष आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

खडसेंना फसविण्याचा दमानियांचा कट

Adil

खूशखबर ! मुंबईतील १० टक्के पाणीकपात रद्द

News Desk

पडसलगीकरांना तीन महिन्यांची मुदतवाढ

News Desk
मुंबई

ड्रायव्हिंग लायसन्स आता कॉलेजातच मिळणार!

News Desk

पुणे : वाहन परवाना काढण्यासाठी आरटीओमध्ये रांगा लावणे किंवा एजंटचे पाया धरावे लागणे, आता थांबणार आहे. शिकाऊ वाहन परवाना (र्निं लायसन्स) देण्याचेअधिकार सर्व शैक्षणिक संस्थांच्या प्राचार्याना देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मुंबईत नुकत्याचझालेल्या बैठकीत राज्याच्या मुख्य सचिवांनीयाबाबतचे आदेश दिले असून, ३१ ऑगस्टला याबाबतचे प्रारूप नियम प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. यामुळे महाविद्यालयीन काळातच विद्यार्थ्यांना विनाकटकट वाहनपरवाने काढून घेता येणार आहेत.

शिकाऊ वाहन परवान्यासाठी सध्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येतात. चाचणी देण्याच्या तारखेला आरटीओ कार्यालयात जावे लागते. त्या ठिकाणीवाहन निरीक्षकांकडून अर्जदाराची चाचणी घेण्यात येते. मुख्य सचिवांनी दिलेल्या आदेशानुसार हे अधिकार प्राचार्याना देण्यात येणार असून, त्यासाठी नियमांत सुधारणाहीकरण्यात येणार आहे. ३१ ऑगस्टला त्याचे प्रारूप प्रसिद्ध झाल्यानंतर पुढील एक महिन्यात त्याला अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे. मात्र, या निर्णयामुळे प्राचार्यावरशैक्षणिक कामाशिवाय एका वेगळ्याच कामाची जबाबदारी येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

वाहन नोंदणी वितरकांकडेच

प्रवासी आणि मालवाहू वाहने वगळता दुचाकी आणि चारचाकी हलक्या मोटारी आदी वाहनांच्या नोंदणीचे काम आरटीओऐवजी संबंधित

वाहन वितरकांकडेच सोपविण्याचानिर्णयही घेण्यात आला आहे. त्यासाठी वाहन वितरकांना नोंदणी प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात येणार आहे.

Related posts

विद्यापीठाचे निकाल लागणे कठिण, कॉँग्रेसने केला अनोखा निषेध

News Desk

मुंबई उपनगरीय लोकल गाड्यांची क्षमता २५ टक्क्यांनी वाढणार

News Desk

अभिनेता सुशांतसिंह सोबत काम केलेल्या एका अभिनेत्याने केली आत्महत्या

News Desk