HW News Marathi
देश / विदेश

अखेर अहमद पटेल जिंकले

नवी दिल्ली – गुजरातमध्ये झालेल्या जोरदार ड्रामेबाजीनंतर काँग्रेसचे अहमद पटेल यांनी ४४ मते मिळवित राज्यसभेची निवडणूक जिंकली. तसेच भाजपाच्या अमित शाह यांनी ४६ आणि स्मृती इराणी यांनी ४६ मते मिळवित राज्यसभेवरील जागा पटकाविली. क्रॉस व्होटींग झाल्यामुळे काँग्रेसने निवडणूक आयोगाचे दार ठोठावत, दोन सदस्यांची मते रद्द करण्याची विनंती केली होती. ही मागणी आयोगाने मान्य केल्यामुळे काँग्रेसचे अहमद पटेल सहज जिंकून येऊ शकले. काँग्रेसने हा सत्याचा विजय असल्याचे म्हटले आहे, तर भाजपाने मात्र आयोगाच्या या निर्णयाविरुद्ध न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे.

दरम्यान, या निवडणुकीत विजयी झाल्यामुळे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह पहिल्यांदा राज्यसभेवर निवडून गेले आहेत. तसेच केंद्रात मंत्री असलेल्या स्मृती इराणी यांनाही मंत्रीपद कायम राखण्यासाठी राज्यसभेवर जागा मिळविणे आवश्यक होते. दरम्यान, अहमद पटेल यांच्या विजयामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांचा आनंद द्विगुणीत झाल्याचे काँग्रेसने म्हटले आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘मोदींनी कोत्या मनोवृत्तीच्या राजकारणात त्यांचे नाव ओढले’, सचिन सावंतांची संतप्त प्रतिक्रिया

News Desk

बाळासाहेबांना अपेक्षित महाराष्ट्र घडवणं, संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न साकारणं हीच खरी आदरांजली !

News Desk

‘अमरावतीतल्या हवाई सुंदरी श्वेता शंकेची धाडसी कामगिरी’, सर्वत्र कौतुकाचा वर्षांव!

Ruchita Chowdhary
मुंबई

मुंबईसह परिसरात जोरदार पाऊस

News Desk

मुंबई- मुंबईसह उपनगरात सोमवारी पहाटेपासून जोरदार पाऊस पडत आहे. कुलाबा, नरिमन पॉइंटसह इतर भागात पहाटेपासून जोरदार पाऊस झाल्याने नागरिकांचे हाल झाले. राज्याच्या इतर भागात पावसाने काही प्रमाणात हजेरी लावल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. नाशिक, जळगावसह पश्चिम महाराष्ट्र विदर्भात देखील पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पावसाने सातत्य ठेवल्यास खरिपाच्या पेरण्य हाती लागतील अशी शेतकऱ्यांना आशा आहे. दरम्यान येत्या 24 तासात राज्यात सर्वत्र दमदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

Related posts

मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाचे सुमारे ६२ टक्के काम पूर्ण; २०२३ अखेर प्रकल्प पूर्ण होईल! – मुख्यमंत्री

Aprna

मोटरमनच्या ‘त्या’ कृत्याला रेल्वे प्रशासन जबाबदार

News Desk

Breaking News | सायन रुग्णालयात एका गोविंदाचा मृत्यू

News Desk