HW News Marathi
देश / विदेश

क्राइम सीरिअल पाहून तिघांनी लुटली बँक, टॅटूवरून चोरीचा छडा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – बँकेतून चोरी करून पसार झालेल्या तीन चोरट्यांना दिल्ली पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडले आहे. टीव्हीवरील क्राइम सीरिअल पाहून चोरट्यांनी बँक फोडल्याची कबुली दिली. विशेष म्हणजे चोरट्याच्या हातावरील टॅटूमुळे या चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले.

21 ऑगस्ट नवी दिल्लीतील मुखर्जीनगर परिसरातील सिंडिकेट बँकेत चोरी झाली होती. बँकेची खिडकी कापून चोरट्यांनी अडीच लाखांची चिल्लर चोरली होती. चोरट्यांनी टीव्हीवरील क्राइम सीरियल पाहून बँकेत चोरी करण्याचा प्लॅन तयार केला होता. आरोपी बँकेलगतच्या बस डेपोमध्ये बसच्या मेन्टनन्सचं काम करायचे. बँकेतील खिडकीला असलेली जाळी कापून हे तीघं बँकेत घुसले आणि त्यांनी 2.30 लाख रूपयांची नाणी घेऊन ते फरार झाले होते. तीनही चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले होते. परंतु त्यांचे चेहरे दिसत नव्हते. एका चोरट्याच्या हातावर टॅटू काढल्याचे दिसून आले. त्यावरून तपास केला असता बँकेशेजारी काम करणाऱ्या तिघांनी हे कृत्ये केल्याचे निदर्शनास आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

सर्वोच्च न्यायालयात सुशांतसिंह मृत्यूप्रकरणी सुनावणी पूर्ण, निर्णय ठेवला राखून 

News Desk

राष्ट्रगीताचा अवमान कराल तर ३ वर्ष शिक्षा  

News Desk

आम्हाला कोणीही तोडू शकत नाही, आम्ही मजबूत आहोत, आम्ही युक्रेनियन आहोत! – व्होदिमर झेलेन्स्की

Aprna
देश / विदेश

आज निवडणुका झाल्यास भाजपचा पराभव !

News Desk

बंगळुरू- प्रचंड पैसा टाकून तसेच देशातील विविध माध्यमांच्या मालकांना हाताशी धरून भाजपने कॉँग्रेसमुक्त भारतचा विडा हाती घेतला आहे. परंतु भाजपच्या या प्रयत्नांना धक्का देणारे वृत्त कर्नाटकमधून हाती येत आहे. येथे आज निवडणुका झाल्यास कॉँग्रेस विजयी होईल, असा अंदाज सी फोर या संस्थेने व्यक्त केला आहे. हा अंदाज देशासाठी नसून केवळ कर्नाटक राज्यासाठी आहे. भाजपच्या जागा वाढण्याची शक्यता आहे. परंतु त्यांना बहुमत मिळणे कठीण जाणार असल्याचे सी फोरने म्हटले आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, सी फोरने एकूण 165विधानसभा मतदारसंघातील 24 हजार 676 मतदारांची मुलाखत घेतली आहे. मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी सूरू केलेली अन्न भाग्य स्कीम मतदारांना प्रचंड आवडली असल्याचे सर्व्हेमध्ये प्रामुख्याने समोर आले आहे. दरम्यान, दक्षिणेत झेंडा रोवण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले आहे. त्यासाठी शहा यांनी दौरा निश्चित केला होता परंतु हा सर्वे आल्यानंतर त्यांनी तीन वेळा कर्नाटकचा दौरा रद्द केला आहे.

Related posts

#CoronaVirus | ‘कोरोना’शी लढण्यासाठी टाटांकडून आणखी १००० कोटींची मदत जाहीर

News Desk

दिल्लीत संभाजीराजेंनी घेतली ज्योतिरादित्य सिंदियांची भेट, कोल्हापूर विमानतळाचे प्रश्न मार्गी लागणार?

News Desk

‘लॉकडाऊन’संदर्भातील ‘ते’ ट्वीट अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी केले डिलीट

News Desk