HW News Marathi
देश / विदेश

कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती

हेग नेदरलँड्स : कुलभूषन जाधव यांना पाकिस्थानने हेरागेरी आणि विघातक कारवायांच्या आरोपावरून फाशीची शिक्षा सुनावली होती. याप्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती दिली आहे. नेदरलॅंड्समधील दि हेग न्यायालयात भारताकडून याचीका दाखल करण्यात आली होती. यावर आज न्यायालयाने कुलभूषन जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थिगिती देत आपला निकाल सुनावला.

अंतिम निकाल येईपर्यंत कुलभूषण जाधव यांना फाशी देता येणार नाही असं आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्पष्ट केलं असून यामुळे पाकिस्तानला चांगलाच दणका बसला आहे. या निर्णयामुळे भारताला

दिलासा मिळाला आहे. कुलभूषण जाधव यांच्या जीवाला धोका असून पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या अंतिम निर्णयापर्यंत फाशी देऊ नये. जाधव सुरक्षीत असल्याची हमी द्या, असं न्यायालयाने सांगितलं.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आगीत दहा जणांचा मृत्यू

News Desk

आसाराम वरुन काँग्रेसचा मोदीवर निशाणा

News Desk

शशिकलांना जेलमध्ये पाच रूम, टीव्ही संच

News Desk
देश / विदेश

भारतीय महिलेचा पाकिस्तानात जबरदस्तीने विवाह

News Desk

इस्लामाबाद – बंदुकीच्या धाकावर पाकिस्तानी नागरिकानं भारतीय महिलेशी लग्न केल्याची घटना पाकिस्तानमध्ये घडलीय. उज्मा असे महिलेचा नाव असून उज्माने पती ताहिर विरोधात इस्लामाबाद कोर्टात याचिका दाखल केली आहे. पतीने मानसिक आणि शारिरीक छळ करत असून जिवे मारण्याची धमकी देत असल्याचं याचिकेत म्हटलेलं आहे.

पतीनं माझे इमिग्रेशन दस्तावेज हिसकावल्याचंही तिने सांगितलं आहे. उज्माला जोपर्यंत सुखरूप भारतात परत पाठवलं जात नाही, तोपर्यंत तिने भारतीय दूतावास सोडण्यास नकार दिला आहे. उज्मा ही स्वतःच्या मर्जीनं तिथे राहतेय आणि पाकिस्तान परराष्ट्र कार्यालयाशी बातचीत केल्यानंतर तिला बाहेर जाण्याची परवानगी देण्यात येईल, असं भारतीय दूतावासानं सांगितलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, त्या पीडित महिलेनं 5 मे रोजी भारतीय उच्चायुक्तालयाकडे मदत मागितली होती आणि तिला आवश्यक मदत पुरवली जाणार आहे. मात्र पाकिस्तानातील पतीनं भारतीय उच्चायुक्तालयावरच भारतीय पत्नीला ताब्यात घेतल्याचा आरोप केला आहे. आम्ही दोघेही व्हिसा घेण्यासाठी भारतीय दूतावासात गेलो होतो. त्यावेळी पत्नी अचानक बेपत्ता झाली, असं त्या पाकिस्तानी व्यक्तीनं सांगितलं आहे. उज्मा आणि ताहिर अली यांची ओळख मलेशियामध्ये झाली होती. त्याच वेळी दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळून आले. त्यानंतर उज्मा 1 मे रोजी वाघा-अटारी सीमेवरून पाकिस्तानात दाखल झाली आणि त्यांनी 3 मे रोजी निकाह केला.

Related posts

जम्मूमधील बस स्टँडवर ग्रेनेड हल्ला

News Desk

सिक्कीममध्ये लष्करी वाहनाला मोठा अपघात;16 जवानांचा मृत्यू तर 4 जवान जखमी

Aprna

दिल्ली उच्च न्यायालयाला आज अर्ध्या दिवसाची सुट्टी 

News Desk