HW News Marathi
देश / विदेश

खाद्यपदार्थ किती टिकणार, ते पाकिटावर लिहिणे बंधनकारक

नवी दिल्ली – कोणताही पाकिटबंद खाद्यपदार्थ कधीपर्यंत खाण्यायोग्य आहे, हे पाकिटावर लिहिणे आता उत्पादकाला बंधनकारक असणार आहे. यासंदर्भात सरकारने नवी नियमावली जारी केली आहे. त्यामुळेआता प्रत्येक खाद्यपदार्थांच्या वेष्टनावर ‘बेस्ट बिफोर’ किंवा ‘यूज बायदि डेट’ असे छापणे गरजेचे होणार असल्याची माहिती सरकारनेमंगळवारी संसदेला दिली.

कोणत्या तारखेपर्यंत पदार्थ वापरला जाऊ शकेल ते लिहिणेअनिवार्य करण्यासाठी लीगल मेट्रॉलॉजी (पॅकेज्ड कमॉडिटीज्) कायदा,२०११मध्ये नवी तरतूद करण्यात आली आहे. ही माहिती एका लेखीउत्तरात लोकसभेत केंद्रीय ग्राहक व्यवहार राज्यमंत्री सी. आर. चौधरीयांनी दिली. ‘बेस्ट बिफोर’ छापताना खाद्यपदार्थांच्या लेबलवर तारीख, महिना व वर्ष हे तिन्ही उल्लेख असणे गरजेचे आहे. काही काळानंतरमानवी वापरासाठी एखादी वस्तू किंवा पदार्थ अयोग्य होणारा असेल, तर त्यावर असे छापणे अत्यंत आवश्यक आहे. यासंदर्भात २३ जूनरोजी सरकारने एक परिपत्रक जारी केले आहे.

कंपन्यांसाठी प्रत्येक उत्पादनाचे ई-कोडिंग करण्याचे बंधन मात्र सैलकरण्यात आले आहे. या ई-कोडिंगमुळे तयार होत असलेले उत्पादन हेसंख्येमध्ये व गुणवत्तेमध्ये योग्य असल्याची हमी स्वतः उत्पादकालादेता येणार असल्यामुळे ई-कोडिंग करावे, असे सरकारने प्रत्येकउत्पादकाला सुचवले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

बँक ऑफ महाराष्ट्रच्या देशभरातील एकूण ५१ शाखा बंद होणार

swarit

लोकसभेच्या उपाध्यक्षपदावर आमचा नैसर्गिक हक्क !

News Desk

भारताचे ‘पोलादी पुरुष’ सरदार वल्लभभाई पटेल

News Desk
महाराष्ट्र

अकोला जिल्हाधिकाऱ्यांनी सायकलवरून वाटले सातबारा

News Desk

अकोला – मंगळवारी महसूल दिनानिमित्त स्वत: येथील जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय शेतकऱ्यांच्या वेषात अकोला तालुक्यातील चांदूर गावात सायकलने गेले आणि त्यांनी शेतकऱ्यांना संगणकीकृत सात-बारा उताऱ्यांचे वितरण केले.

सात-बारा हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज आहे. त्यामुळे शासनाने सातबारा उताऱ्यांचे संगणकीकरण करण्याचा निर्णय घेतला. काही जिल्ह्यांत हे काम अद्याप अपूर्ण असले, तरीही अकोला जिल्ह्यात ते पूर्ण झाले असून, हा संगणकीकृत सात-बारा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी स्वत: जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. मंगळवारी सकाळी ९ वाजता जिल्हाधिकारी सायकलने चांदूर गावात पोहचले. या वेळी त्यांनी संगणकीकृत सात-बाराचे शेतकऱ्यांना वितरण केले. शेतकऱ्यांशी संवाद साधून, त्यांच्या अडचणी जाणून घेणे व त्यांचे मनोधैर्य वाढविणे, हादेखील या उपक्रमामागील उद्देश आहे.

Related posts

बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या कामाची भौतिक प्रगती २७ टक्के

Aprna

महाराष्ट्रातील तरुणाईचे आक्रंदन रॅपच्या माध्यमातून, राष्ट्रवादीचा अनोखा प्रचार

News Desk

एसटी कर्मचाऱ्यांना भोजनभत्ता देण्यात यावा, अनिल परब यांचे निर्देश

News Desk