HW News Marathi
देश / विदेश

ताजमहाल की शिवमंदिर?

नवी दिल्ली : मुघल बादशहा शहाजहान याने पत्नी मुमताज महलसाठी यमुना किनारी ताजमहल ही भव्य संगमरवरी कलाकृती बांधल्याचे मानले जाते. मात्र मुमताजची ही कबर एका राजपूत राजाने बांधलेले मूळचे शिवमंदिर आहे, असे काही संशोधकांचे मत आहे. त्यामुळे ताजमहालच्या निर्मितीबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. म्हणून केंद्रीय संस्कृती मंत्रालयाने याबाबतची शासनाची भूमिका स्पष्ट करावी, असे आदेश केंद्रीय माहिती आयोगाने दिले आहेत.

यमुना नदीकाठी असलेले शुभ्र संगमरवरातील ताजमहाल हे स्मारक जगातील सात आश्चर्यापैकी एक आहे. जगभरातील पर्यटकांचे ते आकर्षण केंद्र आहे. त्यामुळे त्यासंदर्भात असे वाद प्रलंबित ठेवणे योग्य नाही. म्हणून मंत्रालयाने याबाबतच्या शंका आणि वादावर स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता असल्याचे माहिती आयुक्त श्रीधर आचार्युलू यांनी नव्याने दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

चिराग पासवान यांना धक्का, लोकजनशक्ती पार्टीच्या अध्यक्षपदावरून हटवलं!

News Desk

शेतकऱ्यांचा मोर्चा रोखण्याची केंद्राची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली

News Desk

पाकिस्‍तानचे पंतप्रधान इम्रान खान झाले शांतिदूत

Gauri Tilekar
देश / विदेश

नागरिकतेवर प्रश्न उपस्थित करणे यासारखे दुर्दैव नाही – हमीद अन्सारी

News Desk

नवी दिल्ली – जमावांकडून एखाद्या निष्पाप व्यक्तीची निर्घृणपणे करण्यात येणारी हत्या, ‘घरवापसी’, यांसारख्या घटना घडत असतील, तर ही भारतीय मूल्य कमकुवत होत असल्याची लक्षणे आहेत. तुमच्या भारतीय नागरिकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाणे, यासारखी दुसरी दुर्दैवी घटना नाही, अशा शब्दांत मावळते उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

सलग दुसऱ्यांदा उपराष्ट्रपतिपद भूषवलेल्या अन्सारी यांचा कार्यकाळ आज गुरुवारी संपत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यसभा टीव्हीने त्यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी देशात सध्या सुरू असलेल्या घडामोडीवर भाष्य केले.

‘देशातील मुस्लिम समाजामध्ये सध्या भीती आणि असुरक्षेतेची भावना आहे. मुस्लिम समाजाकडे संशयाने पाहिले जाते. देशातील वेगवेगळ्या भागात मी गेलो, त्यावेळी मला असेच संशयाचे बोल ऐकायला मिळाले. बेंगळुरूला गेलो तेव्हाही मी हेच ऐकले आणि उत्तर भारतातून तर मोठ्या प्रमाणात असेचऐकायला मिळते,’ असेही अन्सारी म्हणाले. देशभर सुरू असलेल्या तीन तलाकवर बोलताना अन्सारी म्हणाले की, तीन तलाकच्या अनुचित प्रथेबद्दल दुमत होऊ शकत नाही. मात्र न्यायालयाने यात हस्तक्षेप करू नये, कारण कोणताही बदल समाजामधूनच होत असतो, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

Related posts

अखेर मराठा आरक्षणाची सुनावणी ५ न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे सोपविण्याचा निर्णय

News Desk

पाकड्यांनो, आधी कोरोनाची चिंता करा हो, सामनातून टीका

swarit

श्रीलंकेत सुरक्षा दलाची कारवाई, ३ दहशतवाद्यांसह १५ जणांचा खात्मा

News Desk