HW News Marathi
देश / विदेश

पाकिस्‍तानचे पंतप्रधान इम्रान खान झाले शांतिदूत

नवी दिल्ली | पाकिस्‍तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारत आणि पाकिस्‍तानमधील अनेक गुंतागुंतीच्या प्रश्नांवर शांततेसाठी चर्चा सुरु करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. त्याचप्रमाणे इम्रान खान यांनी भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांच्या बैठकीसाठी संयुक्त राष्ट्रांकडे विनंती केल्‍याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

न्यूयॉर्कमध्ये ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण बैठकीत सुषमा स्वराज आणि कुरेशी यांची भेट घ्यावी यासाठी इम्रान खान प्रयत्नशील असल्याचे चित्र दिसत आहे. इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्रांकडे ‘ही बैठक व्हावी’, अशी मागणी केल्याचे समजते आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी दहशतवाद, काश्मीर प्रश्न असे गुंतागुंतीचे प्रश्न चर्चेने सोडविले पाहिजेत अशी विनंती इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना या पत्रातून केली आहे.

याआधी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्‍यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन करण्यासाठी पत्र लिहिले होते. या पत्रात दोन्ही देशांनी शांततेसाठी चर्चा करण्याची तयारी दाखविली होती. ‘दोन्ही देशातील संबंध सुधारण्यासाठी भारताने एक पाऊल पुढे टाकले तर आम्‍ही दोन पावले पुढे टाकू’, इम्रान खान यांनीही आपल्या निवडणुकीसाठीच्या प्रचारावेळी म्‍हटले होते

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

इमरान खान सरकारच्या नाकर्तेपणामुळे मुजफ्फराबाद वाचवणेही मुश्कील !

News Desk

जेट एअरवेजच्या विमानाची पुन्हा एकदा इमर्जन्सी लँडींग

swarit

डीएसकेंना 22 फेब्रुवारीपर्यंत दिलासा

Adil