HW News Marathi
देश / विदेश

पाऊसही टीम इंडियाला फायनलमध्ये पोहोचवू शकतो

लंडन – उत्तम खेळाच्या जोरावर भारताचा क्रिकेट संघ आयसीसी चषकाच्या अंतिम फेरीत दाखल होऊ शकतो. मात्र, न खेळताही भारतीय संघ या स्पर्धेचा अंतिम सामना खेळू शकतो, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

बलाढ्य दक्षिण आफ्रिकेचा आठ विकेट्सनं पराभव केल्यानंतर भारत उपांत्य फेरीत दाखल झाला आहे. आता भारताला अंतिम फेरी गाठण्यासाठी बांग्लादेशशी 15 जूनला दोन हात करावे लागणार आहेत. जर भारत हा सामना जिंकला तर थेट अंतिम सामन्याला पात्र होईल, आणि जर समजा या दिवशी सामन्याच्या वेळेत पाऊस पडला आणि सामना रद्द झाला तर नेट रनरेटच्या जोरावर भारतीय संघ थेट अंतिम फेरीत पोहोचेल. कारण अंतिम सामन्याप्रमाणे आयसीसीनं उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी कुठलाही राखीव दिवस ठेवलेला नाही. शिवाय 15 जूनला बर्मिगहममध्ये जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलिलेल आहे. त्यामुळं भारतीय संघाच्या फायनल खेळण्याची शक्यता बळवली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

जम्मू- काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ला

News Desk

अमित शहा यांनी स्वीकारला गृहमंत्रिपदाचा पदभार

News Desk

सध्या भारत-पाकिस्तानमध्ये आजपर्यंतची सर्वाधिक तणावाची परिस्थिती !

News Desk
शिक्षण

उल्हासनगरमध्ये राजकीय वैमनस्यातून तुफान हाणामारी

News Desk

गौतम वाघ

उल्हासनगर – राजकारणाशी संबंध नसलेल्या परिवारातील पूजा कौर लबाना ही तरुणी राष्ट्रवादी काँग्रेस कडून निवडून आल्याच्या रागातून शीख समुदायाच्या दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना काल रात्री उल्हासनगरात घडली आहे. नगरसेविकेच्या नातलगांना स्कार्पिओच्या धडकने गंभीर जख्मी करण्यात आले आहे. दोन्ही गटांच्या तलवारबाजीने कॅम्प 5 मच्छी मार्केट मध्ये तणावाचे वातावरण पसरले असून 11 जण जख्मी झाले आहेत. परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. याप्रकरणी हिल लाईन पोलिस ठाण्यात दोन्ही गटांवर परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूजा कौर लबाना ह्या राष्ट्रवादीचे भारत गंगोत्री यांच्या पॅनल मधून निवडून आल्या आहेत. याचा राग विरोधी गटाला आला होता. पूजा कौर यांच्या वडिलांचं मच्छी मॉर्केट मध्ये मटणाचे दूकान आहे. दुस-या गटाने काही दिवसां पूर्वी या मटणाच्या दुकानाला अडथळा होण्याच्या हेतुने चायनीज गाडी लावली होती. त्यातून वाद झाल्यावर त्याची तक्रार पूजा कौरच्या वडिलांनी केली असता, दुस-या गटावर गुन्हा दाखल झाला होता. याच रागातून काल रात्री पूजा कौर यांच्या नातलगांच्या अंगावर दुस-या गटाने स्कार्पिओ कार नेऊन त्यांना जख्मी केले. तसेच बेकायदेशीर जमाव जमवून आणि तलवार,चॉपरने चौघांवर वार केले. विशेष म्हणजे गंभीर जख्मीना शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात उपचारा साठी दाखल करण्यात आल्यावर तिथेही या गटाने राडा करण्याचा प्रयत्न करुन पोलिस,डॉक्टर यांना धक्काबुक्की केली. याप्रकरणी 15 जणांवर मध्यवर्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान दुस-या गटानेही पूजा कौर यांच्या नातलगांची तक्रार केली आहे. स्कॉर्पिओ गाडी मच्छी मार्केट मधून जात असताना गाडी थांबवून गाडीचे नुकसान करण्यात आले.असे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान या दोन्ही गटाच्या दंगलीत 11 जण जख्मी झाले असून अटकसत्र सुरु असल्याची माहिती हिल लाईन ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक मोहन वाघमारे यांनी दिली.

Related posts

नवकलावंतांसाठी जहांगिरमध्ये प्रदर्शनाची संधी

News Desk

सत्तेत आल्यानंतर जावडेकरांना स्वतःच्याच आश्वासनांचा विसर | काँग्रेस प्रदेश शिक्षक सेल

News Desk

जालना येथे सैन्य भरती

News Desk