HW News Marathi
देश / विदेश

पाऊसही टीम इंडियाला फायनलमध्ये पोहोचवू शकतो

लंडन – उत्तम खेळाच्या जोरावर भारताचा क्रिकेट संघ आयसीसी चषकाच्या अंतिम फेरीत दाखल होऊ शकतो. मात्र, न खेळताही भारतीय संघ या स्पर्धेचा अंतिम सामना खेळू शकतो, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

बलाढ्य दक्षिण आफ्रिकेचा आठ विकेट्सनं पराभव केल्यानंतर भारत उपांत्य फेरीत दाखल झाला आहे. आता भारताला अंतिम फेरी गाठण्यासाठी बांग्लादेशशी 15 जूनला दोन हात करावे लागणार आहेत. जर भारत हा सामना जिंकला तर थेट अंतिम सामन्याला पात्र होईल, आणि जर समजा या दिवशी सामन्याच्या वेळेत पाऊस पडला आणि सामना रद्द झाला तर नेट रनरेटच्या जोरावर भारतीय संघ थेट अंतिम फेरीत पोहोचेल. कारण अंतिम सामन्याप्रमाणे आयसीसीनं उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी कुठलाही राखीव दिवस ठेवलेला नाही. शिवाय 15 जूनला बर्मिगहममध्ये जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलिलेल आहे. त्यामुळं भारतीय संघाच्या फायनल खेळण्याची शक्यता बळवली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान मोदींचा यूएईच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मान

Gauri Tilekar

एनडीटीव्हीचे प्रमोटर प्रणय रॉय आणि राधिका रॉय यांच्यावर सेबीची मोठी कारवाई

News Desk

पुलवामा हल्ल्याप्रकरणी पुण्यातून एकाला अटक

News Desk