HW News Marathi
देश / विदेश

पेटत्या चितेतून बाहेर काढला महिलेचा मृतदेह

कौशांबी(उ.प्र) – पोलिसांनी केलेल्या थरारक कारवाया आपण चित्रपटात नेहमी पाहतो, पण अशी कारवाई प्रत्यक्षात होते तेव्हा हृदयाचा थरकाप उडतो. उत्तर प्रदेशातील कोशिंबी जिल्ह्यातील पिपरी परिसरात पोलीिसांनी
अशीच एक धडक कारवाई केली. जळत्या चितेतून महिलेचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात पोलिसांना यश आले. याप्रकरणी पोलिसांनी हुंडाबळी चा गुन्हा नोंदविला आहे.
अर्का गावची गुडियादेवी (24) चे लग्न पिपरीमधील दिलीप कुमारशी 2012 मध्ये झाले होते. शनिवारी रात्री तिला प्रचंड मारहाण करून तिचा खून करण्यात आला. रविवारी सकाळी माहेरच्या लोकांना न कळवताच मृतदेह जाळण्यासाठी स्मशानभूमीत नेला. याची माहिती मिळताच तिच्या माहेरच्यांनी पोलिसात खबर दिली. आणि स्मशानभूमीत धाव घेतली.
पोलिसांनी कसेबसे जळत्या चितेवरून महिलेचा मृतदेह बाहेर काढला. पोलिसांना तेथे पाहताच महिलेच्या नवऱ्यासहित इतर लोक फरार झाले.
मृत महिलेचे वडील नथनलाल यांनी सांगितले की, लग्नानंतर सासरच्या लोकांनी बाइक आणि नगदी 50 हजार रुपयांसाठी गुडियाला त्रास द्यायला सुरुवात केली होती. यासाठीच तिचा खून करण्यात आला. याप्रकरणी तिचा नवरा दिलीप कुमार, सासू-सासरे आणि दिराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर आणखी काही बाबी स्पष्ट होतील.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मायावतीची नवी राजकीय खेळी, काँग्रेस अडचणीत 

swarit

भारतानेच पाकिस्तानशी असलेले सगळे संबंध तोडायला हवे होते !

News Desk

दहशतवादाविरोधी लढाईत अमेरिका भारतासोबत

News Desk