HW News Marathi
देश / विदेश

भारतानेच पाकिस्तानशी असलेले सगळे संबंध तोडायला हवे होते !

नवी दिल्ली | मोदी सरकारच्या जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याच्या ऐतिहासिक निर्णयानंतर पाकिस्तानमध्ये हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर आता भारतावर दबाव वाढविण्यासाठी पाकिस्तानकड्न मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरु आहेत. मग अगदी तो भारत-पाकिस्तान या दोन देशांना जोडणारी ‘समझौता एक्सप्रेस’ थांबविण्याचा निर्णय असो, भारतासोबतचे द्विपक्षीय व्यापारी संबंध तोडण्याचा निर्णय असो, भारतासोबतचे मुत्सद्दी संबंध डाऊनग्रेड करणे असो किंवा भारतासाठी पाकिस्तानची हवाई हद्द बंद करण्याचा निर्णय असो. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“गेली ७० वर्षे भारत पाकिस्तानशी चर्चा करत आहे. असे असूनही जम्मू काश्मीरमधील अस्थिरता कायम आहे. त्यामुळे आता भारताकडून कठोर निर्णय घेण्यात आले आहेत. आता पाकिस्तानला याबद्दल काय वाटते ? हा विचार करणे महत्त्वाचे नाही. खरंतर, भारतानेच पाकिस्तानशी असलेले सगळे संबंध तोडायला हवे होते”, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. दरम्यान, पाकिस्तानकडून भारताविरुद्ध एकापाठोपाठ एक निर्णय घेण्यात येत आहेत. इतकेच नव्हे तर “आपण युद्धाला तयार आहोत”, असे म्हणत पाकिस्तानकडून सीमारेषेवर सैन्यही वाढविण्यात आले आहे. पाकिस्तानकडून पंतप्रधान इम्रान खान यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काश्मीरमध्ये २ दहशतवाद्यांचा खात्मा, १ जवान शहीद

News Desk

नथुराम गोडसे हा देशभक्त होता, देशभक्त आहे आणि देशभक्त राहील !

News Desk