HW News Marathi
देश / विदेश

भारतावर हिंसाचाराचा आरोप करणा-या पाकिस्तानची पोलखोल!

न्यूयॉर्क (वृत्त संस्था) : काश्मीरमध्ये कथित आत्याचार होत असल्याचे सांगत पाकिस्तानच्या वतीने संयुक्त राष्ट संघात दाखविण्यात आलेले चित्र भारतातील नसल्याचे सिद्धन झाल्याने पाकिस्तानची पोलखोल झाली आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्रात दहशतवादाच्या मुद्यावर पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढवल्यानंतर पाकिस्तानने त्यावर उत्तर देताना सरळ असत्याचा आधार घेतला होता. सुषमा स्वराज यांच्या भाषणानंतर ‘राइट टू रिप्लाय’ अंतर्गत पाकिस्तानच्या राजदूत मलीहा लोधी यांनी भारतावर आरोप करताना रक्ताने माखलेले चित्र कश्मीरमधील असल्याचे दाखविले होते. त्याचा बुरखा फाटला आहे.

कश्मीरमधील असल्याचे भासवून ते चित्र दाखविताना लोधी म्हणाल्या होत्या की, ‘हे छायाचित्र रक्तबंबाळ झालेल्या एका मुलीच्या चेहºयाचे आहे. भारतीय सुरक्षा दलाच्या अत्याचारामुळे या मुलीची ही स्थिती झाली आहे’ असा मुद्दा त्यांनी संयुक्त राष्ट्रात उपस्थित केला. परंतु, हे छायाचित्र भारतातील नसून अन्य देशातील आहे. खरे तर, हे छायाचित्र हीदी लिवाइन नावाच्या एकाह फोटोजर्नालिस्टचे आहे. तिच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, इस्त्रायलद्वारे दोन हवाई हल्ले झाल्यानंतर एका कुटुंबातील अनेक लोक मारले गेले. त्या कुटुंबातील पीडित मुलगी या हल्लातून मात्र बचावली होती. बॉम्बमध्ये असलेल्या अणकुचीदार वस्तूंमुळे तिच्या चेहºयाची अशी स्थिती झाली होती, हे आता सिद्ध झाले आहे. त्यामुळे पाकिस्तानची पोलखोल झाली आहे.

भारत म्हणजे दक्षिणा आशियातील दहशतवादाची जननी आहे (मदर आॅफ टेररिझम) असे वक्तव्य भारतावर हल्ला करताना लोधी यांनी केले. कुलभूषण जाधवांसारख्या हेराद्वारे भारत आपल्या देशात दहशतवादाला चालना देत आहे असा आरोपही त्यांनी यावेळी केला. नौदलातील निवृत्त अधिकारी असलेले कुलभूषण जाधव इराणमध्ये व्यवसाय करत होते. तेथून पाकिस्तानने त्यांचे अपहरण केले होते. त्यानंतर त्यांना हेर ठरवून त्यांच्यावर खटला गुदरण्यात आला. सध्या हे प्रकरण कोर्टात आहे.

लोधी यांच्या भाषणापर्ू्वी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढवला होता. पाकिस्तानी पंतप्रधानाकडून भारतावर झालेल्या आरोपांचे त्यांनी केवळ खंडणच केले नाही, तर दहशतवादाच्या मुद्यवर पाकिस्तानला चांगलेच खडसावले. भारत आणि पाकिस्तान एकत्रच स्वतंत्र झाले, परंतु आज भारत डॉक्टर आणि वैज्ञानिक निर्माण करत आहे, तर पाकिस्तान मात्र दहशतवादी आणि जिहादी निर्माण करत आहे असे सुषमा स्वराज म्हणाल्या. भारताने आयआयटी, आयआयएम, एम्ससारख्या संस्था उभारल्या. पाकिस्तानने मात्र लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदसारख्या दहशतवादी संघटना जन्माला घातल्या अशा शब्दात स्वराज यांनी पाकवर हल्ला चढवला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘त्या’ २२० जागांमध्ये संगमनेरदेखील असेल !

News Desk

एका दिवसात 32 ड्रग माफियांना धाडले यमसदनी

News Desk

UGCच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या विरोधात युवासेनेने दाखल केलेल्या याचिकेवर आज होणार सुनावणी

News Desk