HW News Marathi
देश / विदेश

मोदी सरकारच्या कार्यकाळात जातीय हिंसाचारात मोठी वाढ

नवी दिल्ली नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळात देशातील जातीय हिंसाचाराच्या घटनांमध्ये तब्बल ४१ टक्क््यांनी वाढ झाल्याची माहिती खुद्द गृहराज्यमंत्री हंसराज अहिरे यांनी संसदेत दिली. ही माहिती नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालावरून त्यांनी सादर केली आहे. देशात जात व धर्मावरून हिंसा झाल्याचे या निमित्ताने सरकारने मान्य केले आहे.

२०१४ मध्ये धर्म, जात आणि जन्मस्थान यावरून हिंसाचाराच्या ३३६ घटना घटना घडल्या होत्या. २०१६ या वर्षात ही संख्या वाढून थेट ४७५ वर जाऊन पोहोचली, अशी माहिती गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी संसदेत बोलताना दिली. कथित गोरक्षकांच्या हिंसेवरील प्रश्नाला उत्तर देताना अहिर यांनी ही आकडेवारी सादर केली. मात्र, आपल्याकडे गोरक्षकांकडून करण्यात आलेल्या हिंसाचाराबद्दल कोणतीही आकडेवारी नसल्याचे त्यांनी सांगितले. राज्यांचा विचार करता जातीय, सांप्रदायिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये ४९ टक्क््यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. २०१४ मध्ये राज्यांमध्ये अशा प्रकारच्या हिंसाचाराच्या ३१८ घटना घडल्या होत्या. २०१६ मध्ये हा आकडा वाढून ४७४ वर गेला. मात्र, केंद्रशासित प्रदेशांमध्ये हिंसाचाराच्या घटनांमध्ये मोठी घट झाली आहे. दिल्ली आणि इतर केंद्रशासित प्रदेशांमधील जातीय हिंसाचाराच्या घटनांची संख्या कमी झाली आहे. दिल्ली आणि इतर केंद्रशासित प्रदेशांमध्ये २०१४ मध्ये हिंसाचाराच्या १८ घटना नोंदवण्यात आल्या होत्या. २०१६ मध्ये अशा प्रकारची केवळ एक घटना घडली,असे अहिर यांनी संसदेला सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कमांडर अभिनंदन भारतात परतल्यानंतर ‘ही’ असेल पुढील प्रक्रिया

News Desk

पेट्रोल २८ पैसे तर डिझेल १९ पैशांनी महागले

swarit

आज पंतप्रधान मोदींची ‘मन की बात’, भारत-चीन तणावासह कोरोना अनलॉकविषयी बोलणार?

News Desk