HW News Marathi
देश / विदेश

महात्मा गांधींच्या पुतळ्याला लावला मास्क

नवी दिल्ली : वाढत्या प्रदुषणामुळे सतत चर्चेत असलेली देशाची राजधानी आणखी एकदा चर्चेत आली आहे. राजधानी दिल्ली प्रदुषणाच्या विळख्यात असल्यामुळे नागरिक हैरान आहेत. या प्रदुषणामुळे श्वसनाच्या आजाराप्रमाणेच आणखी आजार बळावत चालले आहे. या आजारांपासून बचाव व्हावा यासाठी येथील नागरिक मास्क लावून फिरताना आपल्याला दिसतात.

मात्र आता चक्क महात्मा गांधींच्या पुतळ्याला मास्क लावल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. आम आदमी पार्टीचे निलंबित आमदार कपिल मिश्रा आणि भाजपचे आमदार मनजिंदर सिंग सिरसा यांनी चक्क महात्मा गांधीच्या पुतळ्याला मास्क लावला आहे. प्रदुषण नियंत्रीत ठेवण्यात आम आदमी पार्टी अपयशी ठरल्याचं सांगत यावेळी निदर्शने देखील करण्यात आली. याप्रकरणी या दोघांनाही चाणक्यपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महात्मा गांधीच्या पुतळ्यासोबतच ११ मुर्तींवरिल असलेल्या आणखीही काही पुतळ्यांना हा मास्क लावण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

ट्विटर मोदींच्या राजकीय प्रचाराचा आत्मा होता, त्याच बळावर निवडणुका जिंकल्या, मग आता भाजपचा विरोध का?

News Desk

ठाकरे सरकार पाण्यात हे बसलेल्या म्हशीसारखे आहे ! विनायक मेटेंचा घणाघात

News Desk

अध्यक्षपद स्वीकारण्याबाबत “मी विचार करेन”- राहुल गांधी

News Desk
देश / विदेश

रामजन्म भुमी वगळता कुठेही मशीद बांधता येईल- सुब्रमण्यम स्वामी

News Desk

भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केलं आहे. रामजन्मभुमी वगळता कुठेही मशिद बांधता येईल अस वक्तव्य स्वामी यांनी केलय. सौदी अरेबियामध्ये मशिदी तोडण्यात आल्यानंतर त्या मशिदींची जागा बदलण्यात आली होती. त्याच धर्तीवर भारतात देखील बाबरी मशिद मुस्लीम बहुल भागात हलवण्यात येऊ शकते असं स्वामी यांनी सुचवल्यामुळे नवी वाद निर्माण होण्याची चिन्ह दिसत आहे. भारतातील तब्बल २४००० मंदीर प्राचीन काळात तोडण्यात आली होती. आम्ही यापैकी फक्त मथुरेचं कृष्ण मंदीर, अयोध्येचं राम मंदीर आणि वाराणसीचं काशी विश्वनाथ या मंदिरांच्या उभारणीसंदर्भातच बोलत असल्याचही त्यांनी म्हटलय.

बाबरी मशिद प्रकरण हे सध्या सुप्रीम कोर्टाच्या अखत्यारीत आहे. या प्रकरणात कोर्टाबाहेरच सेटलमेंट करण्याचा पर्याय देखील सुप्रीम कोर्टानं सुचवला होता.

Related posts

नासाच्या कॅलेंडरसाठी भारतीय मुलांनी रेखाटलेल्या चित्रांची निवड

News Desk

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विश्वविजेत्या महिला क्रिकेटपटूंचे अभिनंदन

Aprna

संभाजीराजे राज्यसभा निवडणूक लढणार की माघार घेणार?, उद्या घेणार पत्रकार परिषद

Aprna