HW News Marathi
देश / विदेश

सायंकाळी सातनंतर बंदी असताना ती बस का धावली

वृत्तसंस्था-अमरनाथ श्राईन बोर्डाने गुजरातमधील यात्रेकरुंच्या त्या बसची नोंद का केली नव्हती. जम्मू-श्रीनगर महामार्गावर रात्री सात नंतर कुठलेहे वाहन सोडले जात नसताना ती बस का सोडली गेली, आदी प्रश्न सुरक्षा रक्षाकांनी उपस्थित केले आहे. जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात सात भाविकांचा बळी गेल्यानंतर या मागच्या कारणांची तपासणी सुरक्षा रक्षकांनी सुरू केल्यानंतर हे प्रश्न उपस्थित झाले आहे.

अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ला करण्याची शक्यता सुरक्षा रक्षकांनी वर्तवली होती. त्यानुसार काळजी घेतली जात असताना सायंकाळी सात नंतर बंद असतान तसेच श्राइन बोर्डकडे नोंदणी न केलेली गुजरात पासिंगची बस महामार्गावरून का धावली असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. सुरक्षेचे नियम पाळले गेले असते तर कदाचित ही घटना टाळली असते, असे लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राहुल गांधींच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे लोकसभेत गदारोळ

News Desk

#DelhiResults : दिल्ली निवडणुकीच्या निकालाला मी जबाबदार !

swarit

1 मे पासून अधिका-यांची लालबत्ती गुल

News Desk