HW News Marathi
देश / विदेश

संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून

नवी दिल्लीः संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले. जीएसटी, गो रक्षकांचा उद्रेक, लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबियावर सीबीआयचे छापे आदी मुद्द्यावर हे अधिवेश गाजण्याची शक्यता आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी मात्र हे अधिवेशन ऐतिहासिक ठरण्याची शक्यता वर्तवली आहे. देशात जीएसटी लागु आहे. नवे राष्ट्रपती निवडले जाणार आहेत, त्यामुळे सर्व सदस्य नव्या उत्साहाने या अधिवेशनात सक्रिय सहभाग घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे, अधिवेशन सुरू होण्यापूर्वी मोदींनी माध्यमांना संबोधित करताना सांगितले की, पाऊस ज्या प्रमाणे नवी आशा उत्साह घेऊन येतो, तसेच या अधिवशेनातून देशाला नव्या आशावाद मिळेल. चांगल्या पावसाप्रमाणे जीएसटी आल्यामुळे हे अधिवेशन अधिक खेळीमेळीचे होईल, असे त्यांनी म्हटले आहे, या अधिवेशनात सर्व राजकीय पक्ष राष्ट्रहिताच्या बाबतीत महत्वाची भूमिका निभावतील. सर्वांना सर्व मुद्यावर मते मांडण्याची संधी देण्यात येईल, असेही मोदी यांनी स्पष्ट केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मुख्यमंत्री मरु द्या, आशीर्वाद माझ्या अजितदादांना द्या”- पालकमंत्री भरणे

News Desk

तृप्ती देसाई यांना आयप्पा मंदिरात पोहचण्यापूर्वीच रोखले

News Desk

पेट्रोलचे दर गगणाला भिडल्याने सर्वसामान्याचे खिशे रिकामे

swarit