HW News Marathi
देश / विदेश

भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये १३० ते १७० दहशतवाद्यांचा खात्मा, विदेशी पत्रकाराचा दावा

नवी दिल्ली | पुलवामा येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर प्रत्युत्तर म्हणून भारतीय वायू दलाने बालाकोटमध्ये दहशतवाद्यांच्या तळावर केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या १३० ते १७० दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचा दावा फ्रान्सेस्का मॅरिनो या विदेशी पत्रकाराने केला आहे. दरम्यान, भारताच्या या एअर स्ट्राईकमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांचा आकड्यावरून गेले अनेक दिवस देशातील राजकारण प्रचंड तापले आहे. बालाकोट येथील त्या प्रशिक्षण केंद्रांमध्ये जवळपास ४५ जणांवर उपचार सुरु असून २० जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचा दावा पत्रकार फ्रान्सेस्का मॅरिनो यांच्या अहवालात करण्यात आला आहे.

भारतीय वायू दलाकडून ज्या भागात एअर स्ट्राइक करण्यात आला तो बालाकोटचा भाग आजही सील असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. “भारताच्या एअर स्ट्राइकमध्ये खात्मा झालेल्यांपैकी ११ दहशतवाद्यांचे प्रशिक्षक होते. त्यांपैकी २ प्रशिक्षक हे अफगाणिस्तानचे होते. ज्यात बॉम्बपासून शस्त्रास्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांपर्यंत सर्वांचा समावेश आहे”, असेही या अहवालात म्हणण्यात आले आहे. “भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानी सैन्य घटनास्थळी पोहोचले. या हल्ल्यातील जखमींना शिनकियारीमधील हरकत-उल-मुजाहिद्दीन शिबिरात नेऊन पाकिस्तानी सैन्याच्या डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. ज्या लोकांवर उपचार करण्यात आले आहेत, ते अद्यापही पाकिस्तानी सैन्याच्याच ताब्यात आहेत”, असेही या अहवालात म्हणण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादीला का हवाय पियुष गोयल आणि रविशंकर प्रसाद यांचा राजिनामा 

News Desk

दहशतवाद्यांना जिवंत राहू दिले जाणार नाही

News Desk

‘ट्राय’च्या नव्या नियमाविरोधात केबल व्यावसायिकांचा आक्रमक पवित्रा

News Desk