HW News Marathi
देश / विदेश

१८० शेतकरी संघटना आंदोलनाच्या तयारीत

नवी दिल्ली(वृत्तसंस्था): कर्जमाफी, हमीभावासाठी देशातील शेतकरी आक्रमक होण्याची चिन्हे आहेत. येत्या २० नोव्हेंबर रोजी अखिल भारतीय किसान संघर्ष समितीसह देशातील १८० शेतकरी संघटना राजधानी दिल्लीत तिव्र आंदोलन करणार आहेत. काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशच्या मंदसौर येथे शेतकरी आंदोलनादरम्यान जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन शेतकºयांचा मृत्यू झाला होता. या घटनेविरुद्ध वातावरणनिर्मिती करण्यासाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समितीने देशभरात १० हजार किलोमीटरची पदयात्रा काढली होती. या पदयात्रेची दिल्लीत सांगता होत असल्याच्या पार्श्वभूमीवर २० नोव्हेंबरला हे निर्णयाक आंदोलन करण्यात येणार आहे. महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील शेतकरीही या आंदोलनात सहभागी होणार आहेत. शेतकºयांना पिकाच्या हमीभावापेक्षा कमी पैसे मिळतात. परिणामी एका हंगामात देशभरातील शेतकºयांचे साधारण ३४ हजार कोटींचे नुकसान होते, असा दावा अखिल भारतीय किसान संघर्ष समितीने केला आहे. त्यामुळे शेतकºयांना न्याय मिळावा, या उद्देशाने २० नोव्हेंबरला संसद रस्त्यावर आंदोलन करण्यात येईल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आशियातील पहिली ‘यंगेस्ट आर्यन मॅन’ रविजा सिंगल

News Desk

या वर्षी भारताचा विकासाचा दर 7.8% राहण्याचा रिझर्व्ह बँकेचा अंदाज

News Desk

मोदींना नटसम्राट बनायचं असेल तर सिनेमात जावं ! नाना पटोलेंची घणाघाती टीका 

News Desk
मुंबई

मोनोरेलच्या आगीवर नियंत्रण

News Desk

मुंबई म्हैसूर कॉलनी मोनोेरेल स्टेशनजवळ मोनोरेलच्या शेवटच्या दोन डब्यांना आग लागली. या दुर्घटनेत मोनोचे दोन्ही डबे जळून खाक झाले आहेत. या घटनेते कोणतीही जीवितहानी झालेली नाही.आज पहाटे स्टेशनवर मोनोरेल उभी असताना अचानक आग लागली. आग लागल्यामुळे मोनोरेलची वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. यामुळे ऐन कार्यालय गाठण्याच्या वेळी प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

गुरुवारी पहाटे 5 वाजून 20 मिनिटांनी ही आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे. आग लागल्याचे समजताच अग्निशमन दलाला तातडीनं याची माहिती देण्यात आली. यानंतर अग्निशमन दलानं आग विझवून परिस्थिती नियंत्रणात आणली.

Related posts

बारा तास वीज पुरवठा, शेतक-यांची पुन्हा चेष्ठा

News Desk

विसर्जनानंतर स्वच्छतेसाठी दादर चौपाटीवर पर्यावरण प्रेमी एकटले

swarit

बेस्ट कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण सुरू

News Desk