HW News Marathi
देश / विदेश

#NirbhayaCase : सत्यमेव जयते ! अखेर चारही आरोपी फासावर

नवी दिल्ली | संपूर्ण देशाला हादरून टाकणाऱ्या निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी अखेर आज न्याय मिळाला आहे. तब्बत सात वर्षानंतर निर्भयाच्या आरोपींना फासावर लढकविण्यात आले आहे. आज (२० मार्च) पहाटे साडेपाच वाजता तिहार कारागृहात निर्भयाच्या चारही आरोपींना फासावर लटकविण्यात आले. दोषी मुकेश सिंह, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि विनयकुमार सिंह ही निर्भयाच्या नराधमांची नावे आहेत. एकाच वेळी चार आरोपींना फाशी देण्याची ही पहिलीच वेळ आहे.

निर्भयाच्या चारही आरोपींना फासावर लढकविल्यानंतर डॉक्टरांचे एक पथक ६.१० मिनिटांनी तुरुंगात जाऊन चारही दोषींचा मृत्यू झाल्याची खात्री केली आहे. निर्भयाचा आरोपींना फाशी दिल्यानंतर निर्भयाची आई आशा देवींची प्रतिक्रिया “अखेर निर्भयाच्या आरोपींना फासावर लटकविण्यात आले. हा खूप मोठा संघर्ष होता. आज निर्भयाच्या आरोपींना फाशी मिळाल्याने हा देशातील मुलींला न्याया मिळाला. मी याबद्दल सरकार आणि न्याय व्यवस्थेला धन्यावद करते.”

निर्भयाच्या चारही आरोपींनी फाशीपासून वाचण्यासाठी वेळोवेळी कायदेशीर पर्यांयांचा वापर केला. मात्र अखेर न्यायालयाने निर्भयाच्या सर्व आरोपींची याचिका फेटाळून लावल्या. काल (१९ मार्च) रात्री उशीरा निर्भयाच्या आरोपींनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने चारही आरोपींच्या फाशीच्या शिक्षेला स्थगित देण्यास नकार दिला. अखेर आज सकाळी निर्भयाच्या चारही आरोपींना पवन जल्लाद यांनी अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार खटका ओढला आणि विनय शर्मा, अक्षय सिंह ठाकूर, मुकेश कुमार सिंह आणि पवन गुप्ता या चारही आरोपींना फाशी दिली.

 

 

निर्भयाच्या दोषींची तीन वेळा जारी केले डेथ वॉरंट

निर्भया प्रकरणात यापूर्वी पटियाला हाऊस न्यायालयाने २२ जानेवारी रोजी डेथ वॉरंट जारी केले होते. यानंतर पुन्हा एकदा १ फेब्रुवारी फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी केली जाणार होती. परंतु, न्यायालयाने ३१ जानेवारी रोजी एका याचिकेवर सुनावणी करताना या शिक्षेची अंमलबजावणी थांबविली होती. न्यायालयाने आतापर्यंत जारी केलेले हे तिसरे डेथ वॉरंट आहे. न्यायालयाने १७ फेब्रुवारी रोजी या प्रकरणातील तिसरे डेथ वॉरंट जारी करीत ३ मार्च रोजी सकाळी ६ वाजता फाशीची तारिख निश्चित केली आहे.

१६ डिसेंबरची ‘ती ‘ काळरात्र

१६ डिसेंबर २०१२च्या रात्री पॅरामेडिकलची विद्यार्थीनी निर्भया आणि तिचा मित्र दिल्लीतील एका मॉलमधून सिनेमा पाहून घरी परतत होते. मित्रासोबत खासगी बसमधून मुनिरकाहून द्वारकाला जात होती. बसमध्ये त्या दोघांशिवाय सहा जण होते. त्या बसमध्ये आधीपासूनच चालकासह सहा जण होते. बस सुरू झाल्यावर त्या सहा जणांनी निर्भयाोसबत छेडछाड करायला सुरुवात केली. त्यावेळी तिच्या मित्राने त्यांना विरोध केला. मात्र, आरोपींनी मित्राला बेदम मारहाण केली. त्यामुळे तो बेशुद्ध झाला. त्यानंतर या सहा जणांनी निर्भयावर बसमध्येच बलात्कार केला. त्यावेळी त्यांनी तिला अत्यंत निर्घृणपणे मारहाणही केली होती. त्यामुळे निर्भया गंभीररित्या जखमी झाली होती. यानंतर आरोपींनी निर्भयाला रस्त्याकडेला फेकून दिले होते. या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. जखमी निर्भयावर आधी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर तिला सिंगापूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले. सिंगापूरमध्ये उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बुऱ्हाण वाणीला श्रद्धांजली वाहण्यावरून खोऱ्यात पुन्हा तणाव

News Desk

“संरक्षणमंत्री राजनाथसिंह, माजी सैनिक सोनु महाजन यांना न्याय कधी मिळणार ?”

News Desk

जानेवारी ते मार्च महिन्यात लग्न करण्यास बंदी

News Desk