HW News Marathi
देश / विदेश

चीनमुळे अरुणाचल प्रदेशमध्ये दुष्काळाचे सावट

नवी दिल्लीभारतीय सीमेवर चीन सैनिकांच्या कुरघोड्या सतत सुरु असतात. चीनने तिबेटमधून वाहणाऱ्या ब्रम्हपुत्रा नदीचे पाणी अडवल्याचे समजते आहे. त्यामुळे अरुणाचल प्रदेशमधल्या काही भागांमध्ये दुष्काळ ओढवला आहे.”ब्रम्हपुत्रा नदीचे पाणी अडविल्यामुळे अरुणाचल प्रदेशातील तुतिंग, यिंगकियोंग आणि पासीघाट याठिकाणी दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे”,असे पत्र काँग्रेसचे खासदार निनोंग एरिंग यांनी जलसंधारण मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी लिहिले आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी सुद्धा यामध्ये हस्तक्षेप करावा अशी मागणी केली.

अरुणाचल प्रदेशातील सियांग जिल्हा प्रशासनाने येथील नदीच्या भागातील लोकांना अलर्ट जारी केला आहे. खासकरुन मच्छिमार व्यवसाय करणाऱ्या नागरिकांना काळजी घेण्यास सांगितले आहे. कारण,चीनने ब्रम्हपुत्रा नदीचे पाणी सोडले तर पूरस्थिती निर्माण घेण्याची शक्यता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘या’ राज्यात भाजपची सत्ता धोक्यात, पक्षातील ९ आमदारांचा राजीनामा

News Desk

राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीबाबत राज्यपालांना सूचना करावी, ठाकरे सरकारची मोदींना विनंती

News Desk

मोदी सरकारचे अपयश लपवण्यासाठी सुशांतसिंह प्रकरणाचा वापर !

News Desk