HW News Marathi
देश / विदेश

298 भारतीय झाले पाकिस्तानी!

इस्लामाबाद – दहशतवादाने बजबजलेल्या पाकिस्तानातून अनेक कलाकार, उद्योजक, विचारवंत भारताची वाट धरत असताना काही भारतीयांना मात्र पाकिस्तान जवळचा वाटला आहे. त्यामुळे त्यांनी थेट पाकिस्तानचे नागरिकत्व स्वीकारले आहे. 2012 पासून 14 एप्रिल 2017पर्यंत 298 भारतीयांना पाकिस्तानी नागरिकत्व देण्यात आल्याची माहिती पाकिस्तानी गृहमंत्रालयाने संसदेत दिली. सत्ताधारी पार्टी PML-Nचे खासदार शेख रुहेल असगर यांनी याबाबत संसदेत प्रश्न उपस्थिती केला होता. 2012मध्ये 48 भारतीयांना पाकिस्तानचं नागरिकत्व बहाल करण्यात आले. तसेच 75 आणि 2014मध्ये जवळपास 76 लोकांना नागरिकत्व मिळालं आहे. 2015मध्ये 15 भारतीय व्यक्तींना पाकिस्ताननं नागरिकत्व बहाल केलं आहे. तसेच 2016मध्ये 69 लोकांना पाकिस्तानी नागरिकत्व देण्यात आलं आहे. 2017मध्ये 14 एप्रिलपर्यंत 15 भारतीय प्रवाशांना पाकिस्तानी नागरिकत्व मिळालं आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात पाकिस्तानचे गृहमंत्री चौधरी निसार अली खान यांनी एका भारतीय महिलेला पाकिस्तानी नागरिकत्व दिलं होतं. त्या महिलेच्या पतीचं निधन झालं आहे. महिलेनं 2008 मध्ये पाकिस्तानी नागरिकत्व मिळवण्याचा अर्ज केला होता. तेव्हापासून तिचा अर्ज प्रलंबित होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

महाराष्ट्रात काँग्रेसकडून बाळासाहेब ठाकरेंना बदनाम करण्याचा प्रयत्न!; मोदींचा गंभीर आरोप

Aprna

पंतप्रधानांनी मराठीतून दिल्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा

News Desk

ओवेसींसमोर ‘पाकिस्तान झिंदाबाद’ची घोषणा देणाऱ्या तरुणीला न्यायालयीन कोठडी

swarit
मुंबई

मालगाडी घसरल्याने नाशिक, मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा

News Desk

कसारा- कसारा रेल्वेस्थानकाजवळ मालगाडीचे डबे घसरल्याने नाशिक तसेच मुंबईकडे जाणाऱ्या बहुतांश रेल्वे रखडल्या असून विकेंडला घरी जाणाऱ्या चाकरमान्यांचा मोठा खोळंबा झाला आहे. कसाऱ्याजवळ मालगाडीच्या डबे घसरण्याच्या घटनेमुळे मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसहून कसारा स्टेशन गाठणाऱ्या प्रवाशांचे चांगलेच हाल सुरू आहेत. घसरलेले डब्बे रुळावर आणण्याचा युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे.

Related posts

आरेतील आग जाणीवपूर्वक लावली, अग्निशमन दलाचा अहवाल जाहीर

News Desk

चुकीचा अर्थ काढणा-यांना साईबाबा सद्दबुध्दी देवो | सुधीर मुनगंटीवार

News Desk

शिवसेनेनं सरकारमधून बाहेर पडून शिवसंपर्क मोहीम राबवावी – अशोक चव्हाण

News Desk