HW News Marathi
देश / विदेश

298 भारतीय झाले पाकिस्तानी!

इस्लामाबाद – दहशतवादाने बजबजलेल्या पाकिस्तानातून अनेक कलाकार, उद्योजक, विचारवंत भारताची वाट धरत असताना काही भारतीयांना मात्र पाकिस्तान जवळचा वाटला आहे. त्यामुळे त्यांनी थेट पाकिस्तानचे नागरिकत्व स्वीकारले आहे. 2012 पासून 14 एप्रिल 2017पर्यंत 298 भारतीयांना पाकिस्तानी नागरिकत्व देण्यात आल्याची माहिती पाकिस्तानी गृहमंत्रालयाने संसदेत दिली. सत्ताधारी पार्टी PML-Nचे खासदार शेख रुहेल असगर यांनी याबाबत संसदेत प्रश्न उपस्थिती केला होता. 2012मध्ये 48 भारतीयांना पाकिस्तानचं नागरिकत्व बहाल करण्यात आले. तसेच 75 आणि 2014मध्ये जवळपास 76 लोकांना नागरिकत्व मिळालं आहे. 2015मध्ये 15 भारतीय व्यक्तींना पाकिस्ताननं नागरिकत्व बहाल केलं आहे. तसेच 2016मध्ये 69 लोकांना पाकिस्तानी नागरिकत्व देण्यात आलं आहे. 2017मध्ये 14 एप्रिलपर्यंत 15 भारतीय प्रवाशांना पाकिस्तानी नागरिकत्व मिळालं आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात पाकिस्तानचे गृहमंत्री चौधरी निसार अली खान यांनी एका भारतीय महिलेला पाकिस्तानी नागरिकत्व दिलं होतं. त्या महिलेच्या पतीचं निधन झालं आहे. महिलेनं 2008 मध्ये पाकिस्तानी नागरिकत्व मिळवण्याचा अर्ज केला होता. तेव्हापासून तिचा अर्ज प्रलंबित होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“प. बंगालप्रमाणेच महाराष्ट्र देखील ‘या’ दहशतवाद्यांशी सामना करेल!”

News Desk

बँकेपेक्षा जास्त व्याज देईन | नितीन गडकरी

swarit

भारताच्या अभिजीत बॅनर्जी यांना यंदाचा अर्थशास्त्र नोबेल पुरस्कार जाहीर

News Desk