HW News Marathi
देश / विदेश

उत्तर भारतात ४१ पूरबळी!

पाटणा उत्तर भारतात पुराने थैमान घातले आहे. उत्तरेकडील १० राज्यांत आलेल्या या पुराने आतापर्यंत सुमारे ४१ जणांचा बळी घेतलाआहे. बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, आसामसह आदी १० राज्यांत महापुर आला आहे. दरम्यान, नेपाळच्या तराई भागात गेल्या चार दिवसांपासून अतिवृष्टी झाल्यामुळे तेथून येणाऱ्या जलप्रपाताने सखल भाग असलेलाबिहार जलमय झाला आहे. गंगेसह, कोसी, महानंदा नदीला पूर आला असून बिहारच्या किशनगंज, पूर्णिया, अररिया, कटिहार, पश्चिमचंपारण, सहरसा आणि सुपौलसह १२ जिल्ह्यांना त्याचा फटका बसला आहे. येथील रेल्वे, वीज आणि दूरसंचार सेवा ठप्प झाली असूनलष्कर, एनडीआरएफ, हवाई दलाने बचाव मोहीम हाती घेतली आहे. तब्बल ४० लाख लोकांना या पुराचा तडाखा सहन करावा लागत आहे. गेल्या ३-४ दिवसांपासून नेपाळमध्ये ३ ते १० पट अधिक पाऊस झाला आहे. नेपाळमध्ये प्रचंड पावसानंतर वाल्मीकीनगर गंडकबांधातून सुमारे १० लाख क्युसेक पाणी सोडण्यात आले. तसेच पूर्वांचलमध्येही मोठा पाऊस होत आहे. त्यामुळे बिहारमध्ये ३०० टक्केअधिक पाणी आले आहे.

३० वर्षांचा विक्रम मोडीत

ब्रम्हपुत्र नदी दुसऱ्यांदा दुथडी भरून वाहतेय. यात १० जणांचा मृत्यू झाला. राज्याच्या ७० टक्के भागांत पाणी आहे. यंदा पावसाने ३०वर्षांचा विक्रम मोडीत काढला आहे. कैलास मानसरोवर मार्गावर चौघे ठार पिथौरगड जिल्ह्यात कैलास मानसरोवर मार्गावर सोमवारी पहाटे ढगफुटी होऊन ३ जवानांसह चौघे ठार झाले असून 6 जण बेपत्ता आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षण | १५ जुलैला अंतरीम आदेशासाठी सुनावणी होणार, पदव्युत्तर अभ्याक्रमातील आरक्षणावर तेव्हाच निर्णय होण्याची शक्यता

News Desk

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण महत्त्वपूर्ण वळणावर, तपास NIA कडे

News Desk

गुगलमुळे हत्येच्या कटातून सुटका

News Desk