HW News Marathi
देश / विदेश

भारतीय महिलेचा पाकिस्तानात जबरदस्तीने विवाह

इस्लामाबाद – बंदुकीच्या धाकावर पाकिस्तानी नागरिकानं भारतीय महिलेशी लग्न केल्याची घटना पाकिस्तानमध्ये घडलीय. उज्मा असे महिलेचा नाव असून उज्माने पती ताहिर विरोधात इस्लामाबाद कोर्टात याचिका दाखल केली आहे. पतीने मानसिक आणि शारिरीक छळ करत असून जिवे मारण्याची धमकी देत असल्याचं याचिकेत म्हटलेलं आहे.

पतीनं माझे इमिग्रेशन दस्तावेज हिसकावल्याचंही तिने सांगितलं आहे. उज्माला जोपर्यंत सुखरूप भारतात परत पाठवलं जात नाही, तोपर्यंत तिने भारतीय दूतावास सोडण्यास नकार दिला आहे. उज्मा ही स्वतःच्या मर्जीनं तिथे राहतेय आणि पाकिस्तान परराष्ट्र कार्यालयाशी बातचीत केल्यानंतर तिला बाहेर जाण्याची परवानगी देण्यात येईल, असं भारतीय दूतावासानं सांगितलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, त्या पीडित महिलेनं 5 मे रोजी भारतीय उच्चायुक्तालयाकडे मदत मागितली होती आणि तिला आवश्यक मदत पुरवली जाणार आहे. मात्र पाकिस्तानातील पतीनं भारतीय उच्चायुक्तालयावरच भारतीय पत्नीला ताब्यात घेतल्याचा आरोप केला आहे. आम्ही दोघेही व्हिसा घेण्यासाठी भारतीय दूतावासात गेलो होतो. त्यावेळी पत्नी अचानक बेपत्ता झाली, असं त्या पाकिस्तानी व्यक्तीनं सांगितलं आहे. उज्मा आणि ताहिर अली यांची ओळख मलेशियामध्ये झाली होती. त्याच वेळी दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळून आले. त्यानंतर उज्मा 1 मे रोजी वाघा-अटारी सीमेवरून पाकिस्तानात दाखल झाली आणि त्यांनी 3 मे रोजी निकाह केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘शरद पवार- संजय राऊत’ मुलाखतीचा सामना या कारणामुळे रद्द….

News Desk

राज्यसभेत जम्मू-काश्मीर विभाजनचा प्रस्ताव मंजूर

News Desk

संभाजीराजे तुम्ही संघर्ष थांबवून संवाद सुरु केलात, पण अनेकजण आदळआपट करतायत !

News Desk