HW News Marathi
देश / विदेश

फटाका फॅक्टरीच्या गोडाऊनमध्ये मोठा स्फोट, ७ जणांचा मृत्यू

बदायू | उत्तर प्रदेशातील येथील बदायू येथील फटाका फॅक्टरीच्या गोडाऊनमध्ये शुक्रवारी दुपारी मोठा स्फोट झाल्याची घटना घडली. या स्फोटात सात जणांचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळी रुग्णालयात हलविण्यात आले आहेत. फटाका फॅक्टरीमधील स्फोट मोठा होता की, यात गोडाऊन जमिनदोस्त झाले आहे.

ही घटना सिव्हिल लाइन पोलीस स्टेशनच्या हद्दीत घटनेची माहिती मिळताच फायर बिग्रेड आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. सिव्हिल लाइन पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने संपुर्ण परिसर सील केला आहे. या स्फोटात पोलिसांनी काडतूस आढळल्याची माहितीसमोर आली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह AIIMS रुग्णालयात दाखल

swarit

सैनिकांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, भारत जशास तसे उत्तर देण्यास सक्षम !

News Desk

मध्यप्रदेशने राष्ट्रीय एकात्मतेवर हातोडा मारला, सामनातून मध्यप्रदेश सरकारवर टीका

News Desk
मनोरंजन

दिवाळीचा पाडवा, साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त

News Desk

कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बलिप्रतिपदा हा सण साजरा केला जातो. हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून ही ओळखतात. या दिवशी बळी राजाचे रांगोळीने चित्र काढतात व त्याची पूजा करतात, आणि ‘इडा पीडा टळो व बळीचे राज्य येवो’ असे म्हणतात. साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त म्हणून या दिवसाला विशेष महत्व आहे. शेतकरी पहाटे स्नान करून डोक्यावर घोंगडी घेतात व एका मडक्यात कणकेचा पेटता दिवा घेऊन शेतात जातात व ते मडके शेताच्या बांधावर खड्डा करून पुरतात. काही ठिकाणी बळीची अश्वारूढ प्रतिमा करून तिची पूजा केली जाते.शेणाचा बळीराजा करण्याची प्रथाही अस्तित्वात आहे. या शेणाला “शुभा” असे म्हणतात. असा हा लोककल्याणकारी राजा बळी, त्याच्या पूजनाचा दिवस. या दिवशी विक्रम संवत सुरू होतो.

पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी लोक दिवाळीतील पाडवा ही नववर्षाची सुरुवात मानतात. लक्ष्मीप्राप्तीसाठी नव्या वह्यांचे पूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात.व्यापारी लोकांच्या जमा-खर्चाच्या कीर्द-खतावणीच्या नवीन वह्या ह्या दिवशी सुरू होतोत. कीर्द-खतावणीच्या नवीन वह्या सुरू करण्यापूर्वी वह्यांना हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता वाहून पूजा करतात. व्यापारी या दिवशी मुहूर्ताने व्यवहार सुद्धा करतात. घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्‍नी पतीला औक्षण करते व पती पत्‍नीला ऒवाळणी घालतो. नवविवाहित दांपत्याची पहिली दिवाळी पत्‍नीच्या माहेरी साजरी करतात. ह्यालाच “दिवाळसण” म्हणतात.

दिवाळ सणानिमित्त यादिवशी जावयास आहेर करतात. दक्षिण भारतात या दिवशी बलीची प्रतिमा तयार करून ती गोठ्यात ठेवतात व तिची पूजा करतात. गायी – बैलांना रंग लावून व माळा लावून सजवतात. पाताणे प्रभू (पाठारे प्रभू) लोकांत बळीची अश्वारूढ प्रतिमा उंच जागी उभी करून तिच्या भोवती एकवीस दिवे मांडण्याचीही प्रथा आहे.

Related posts

मेघाची हिंदी बिगबॉसमध्ये मेगा एन्ट्री

Gauri Tilekar

आता बाप्पा पण झाला सिंघम?

swarit

कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या एसटी बसला आग, प्रवासी थोडक्यात बचावले

News Desk