HW News Marathi
देश / विदेश

७ राज्यातील २६ जागांसाठी राज्यसभेत आज मतदान

नवी दिल्ली | राज्यसभेत उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक, झारखंड, छत्तीसगढ, तेलंगणा आणि केरळ या ७ राज्यातील २६ जागांसाठी आज मतदान होणार आहे. तसेच महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, आंध्र प्रदेश, हरियाणा, बिहार, हिमाचल प्रदेश, देहरादून आणि ओडिसा १० राज्यामध्ये बिनविरोध निवडणुका झाल्या आहेत.

महाराष्ट्रातून ६ जागासाठी निवडणुका झाल्या होत्या. यात भाजपकडून प्रकाश जावडेकर, नारायण राणे आणि व्ही. मुरलीधरन यांची बिनविरोध निवड झाली. तर काँग्रेसकडून कुमार केतकर, राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण आणि शिवसेनेकडून अनिल देसाई या ६ जणांची राज्यसभेवर बिनविरोध निवडणूक झाली आहे.

राज्यसभेत एकूण २४५ जागा असून पक्षाला बहुमतासाठी १२६ जागाची गरज आहे. सध्या मोदी सरकारचे राज्यसभेत ५८ सदस्य आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अरुण जेटली यांची प्रकृती चिंताजनक

News Desk

लोकलमधून फ्रिज नेण्याचा प्रयत्न फसतो तेव्हा.

News Desk

रोहित पवार जरा तुम्ही शरद पवारांच्या खांद्यावरून खाली उतरा !, पडळकरांची टीका

News Desk
राजकारण

विधिमंडळातील राजदंड मतदारसंघात नेण्यासाठी मला परवानगी द्या !

News Desk

मुंबई | विधीमंडळातील राजदंडाकडे जर केवळ शोभेची वस्तू म्हणून पाहण्यात येणार असेल तर मग हा मला मतदारसंघात नेऊ द्या, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. राजदंड उचलल्यानंतर सभागृह तहकूब करण्याऐवजी कामकाज सुरूच ठेवण्यात आल्याने जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना पत्र लिहून त्यांच्याकडे राजदंड मतदारसंघात नेण्यासाठी परवानगी देण्याची मागणी केली.

मराठा, धनगर, मुस्लीम आरक्षणाच्या मुद्द्यावरून आज विधिमंडळात मोठा गदारोळ झाला. यावेळी मुस्मील आमदाराकडून राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला गेला. यामुळे विधानसभेचे कामकाज २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले होते. तसेच मुस्लिम आमदारांनी विधानसभा अध्यक्षांच्या दिशेने कागद देखील भिरकावले. काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी मुस्लिम आरक्षणावरून राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला आहे.

जितेंद्र आव्हाड नेमके काय म्हणाले ?

‘जेव्हा विधानसभेचे अध्यक्ष विधीमंडळात असतात तेव्हाच हा राजदंड असतो. ते याचे एक प्रातिनिधीक सन्मानचिन्ह असते. त्यामुळे हा राजदंड उचलल्यानंतर सभागृह तहकूब व्हायला हवी होती. मात्र आज तसे न होता राजदंड उचलल्यावरही विधीमंडळाचे कामकाज सुरूच राहिले’, असे आव्हाड यांनी म्हटले आहे.

Related posts

15 फेब्रुवारीपासून राष्ट्रवादी कॉग्रेसचा उत्तर महाराष्ट्रात हल्लाबोल

swarit

“…म्हणूनच तुमची इतकी मस्ती आणि चरबी वाढली”, संजय राऊतांचं देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र

Aprna

आमच्या उमेदवारांचा पराभव काँग्रेस-राष्ट्रवादीमुळेच !

News Desk