HW News Marathi
देश / विदेश

आरूषी हत्येचे गुढ कायम, तलवार दाम्पत निर्दोष

नवी दिल्ली: बहुचर्चित आरुषी, हेमराज हत्याकांड प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाने आरोपी राजेश व नुपूर तलवार यांची निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणात सीबीआय न्यायालयाने २६ नोव्हेंबर २०१३ रोजी आरुषीचे आई-वडील राजेश आणि नुपूर तलावर यांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाविरोधात राजेश आणि नुपूर तलवार यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर आज सुनावणी झाली असता, न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. राजेश आणि नुपूर तलवार सध्या गाजियाबादच्या डासना जेलमध्ये तुरुंगवास भोगत आहेत. न्यायमूर्ती बी. के. नारायण आणि न्यायमूर्ती एके मिश्रा यांच्या खंडपीठाने ७ सप्टेंबरला आरुषी व हेमराज हत्या प्रकरण निर्णय राखून ठेवला होता.

उत्तर प्रदेश पोलिसांनी आॅनर किलिंगमधून या दोन्ही हत्या झाल्याचा निष्कर्ष काढला होता. अखेर तत्कालीन मुख्यमंत्री मायावतींनी हे प्रकरण तपासासाठी सीबीआयकडे सोपवले होते. सीबीआय न्यायालयाने २६ नोव्हेंबर २०१३ रोजी आरुषीचे आई-वडील राजेश आणि नुपूर तलावर यांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. परंतु अलाहाबाद न्यायालयानं आज त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भिलाई स्टील प्लांटमध्ये स्फोट, ९ कर्मचाऱ्यांचा मृत्यू

News Desk

एअर इंडियाच्या विमानातील क्रू मेंबर्सना ‘जय हिंद’ बोलणे बंधनकारक

News Desk

हनीप्रीत-राम-रहीम जेलमध्ये येणार एकत्र ?

News Desk