HW News Marathi
मुंबई

फेरीवाल्यांना हटवा, राज यांचे आयुक्तांना निवेदन

मुंबई: राज ठाकरे यांनी बुधवारी महापालिका आयुकत्त अजय मेहता यांची भेट घेऊन रस्त्यांवरून फेरीवाल्यांना त्वरीत हटवण्यासंदर्भात निवेदन सादर केले. यावेळी राज यांनी रेल्वे पूल आणि फुटपाथवरून चालणा-या लोकांच्या समस्याही त्यांच्यापुढे मांडल्या. या निवेदनात राज यांनी फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासंदभार्तील अनेक मुद्देही उपस्थित केले आहेत.

या समस्येवर कायमचा तोडगा काढण्यासाठी आयुक्तांनी पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांशी चर्चा करावी. जेणेकरून तिन्ही यंत्रणांच्या समन्वयातून ठोस पावले उचलली जातील. मनसेच्या संताप मोचार्नंतर बहुतांश रेल्वे स्थानकांच्या परिसरातील फेरीवाल्यांना हटवण्यात आले आहे. मात्र, हे सगळे किती दिवस टिकेल, असा प्रश्नही लोकांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे लोकांना यासंदर्भात तक्रारी करण्यासाठी पालिकेने व्हॉटसअ‍ॅप क्रमांक उपलब्ध करून द्यावेत. फेरीवाले बसतात त्या परिसरात हे व्हॉटसअ‍ॅप क्रमांक असलेले फलक पालिकेने लावावेत. जेणेकरून प्रवाशांना त्यांच्या परिसरात फेरीवाल्यांकडून होणाºया अतिक्रमणाचे फोटो पाठवता येतील.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ईदच्या दिवशी अचानक झालेल्या अपघातामुळे वाहतुकीचा खोळंबा

News Desk

मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने मुंबई विभागातून सर्वाधिक म्हणजे 615 मुलांची केली सुटका

Aprna

28 हजार महापालिका कर्मचारी करत आहेत मुंबईची स्वच्छता

News Desk