HW News Marathi
देश / विदेश

देशातील ‘या’ ५ विमानतळांची जबाबदारी आता अदानीकडे

नवी दिल्ली । देशातील पाच विमानतळांची जबाबदारी आता अदानी समूहाकडे असणार आहे. केंद्राने राबविलेल्या सहा विमानतळांच्या खासगीकरणाच्या निविदा प्रक्रियेतील पाच विमानतळांच्या संचालनाची बोली अदानी समूहाने जिंकल्याने त्यांच्याकडे या पाच विमानतळांची जबाबदारी असणार आहे.

अहमदाबाद, तिरुवनंतपूरम, लखनौ, मंगळुरू आणि जयपूर या विमानतळांच्या संचलनाची जबाबदारी आता अदानी समूहाकडे असणार आहे. या विमानतळांचे खाजगीकरण होणार असल्याने येथे जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा मिळू शकणार आहेत. ही पाच विमानतळे औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर अदानी समूहाकडे सोपविण्यात येणार आहेत.

२०१८ साली नोव्हेंबरमध्ये सरकारकडून सहा विमानतळांच्या सार्वजनिक-खासगी भागीदारीसाठी एका प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती. त्यावेळी अहमदाबाद आणि जयपूर विमानतळासाठी ७, लखनौ आणि गुवाहाटीसाठी ६ निविदा, तर मंगळुरू आणि तिरुवनंतपूरमसाठी ३ निविदा प्राप्त झाल्या होत्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Amritsar : ट्रेन अपघाताची न्यायालयीन चौकशी होणार । मुख्यमंत्री सिंग

News Desk

कुणी मुद्दामहून आमच्या वाटेला आले तर आम्ही त्याला सोडत नाही !

News Desk

महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरुनच ‘हे’ सगळं सुरु, नवनीत राणांचा गंभीर आरोप 

News Desk