HW News Marathi
देश / विदेश

#AirStrike : सिनेकलाकारांचा भारतीय वायु दलाला सलाम

मुंबई | पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या अवघ्या १२ दिवसांनंतर भारतीय वायू सेनेने पाकिस्तानविरोधात मोठी कारवाई केली आहे. वायू सेनेने पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर १००० किलो वजनाचा बॉम्ब फेकला. पाकिस्तानच्या हद्दीत घुसून भारतीय वायू सेनेने केलेली ही आत्तापर्यंत सर्वांत मोठी कारवाई असल्याचे म्हटले जाते. या कारवाईनंतर भारतीय वायू दल, सैन्य आणि सरकारचे देशभरातून कौतुक होत आहे. यात बॉलिवूड कलाकार देखील मागे नाही. विकी कौशल, रजनीकांत, राजकुमार राव, कपिल शर्मा, अनुपम खेर, परेश रावल, मुग्धा गोडसे, अभिषेक बच्चन, अजय देवगण, अक्षय कुमार अशा अनेक बॉलिवूड कलाकारांनी भारतीय वायू दलाच्या कामगिरीला सलाम केला आहे.

‘उरी’ या प्रसिद्ध चित्रपटानंतर प्रकाश झोतात झालेला अभिनेता विकी कौशल याने देखील ट्विट करून आयडी भारतीय वायू दलाला सलाम केला आहे.

अभिनेता अजय देवगणने “Mess with the best, die like the rest. Salute” असे ट्विट करत, या भारतीय वायू दलाच्या कारवाईचे तोंडभर कौतुक केले आहे. म्हणजेच ‘शक्तिशाली व्यक्तिशी वैर पत्करले तर उध्वस्त व्हाल,’ असे अजय देवगणने म्हटले आहे.

भारत माता की जय, असे ट्विट करत अभिनेते अनुपम खेर यांनी देखील भारतीय वायू दलाच्या कारवाईचे कौतुक केले आहे.

“आजची सकाळ खरंच फार सुंदर होती”, असे ट्विट करत अभिनेते परेश रावल यांनी मोदी सरकार आणि भारतीय वायू दलाचे आभार मानले आहेत.

“अंदर घुस के मारो” असे म्हणत आपल्याला भारतीय वायू दलाच्या कारवाईचा अभिमान वाटतो, असे अभिनेता अक्षय कुमार याने म्हटले आहे.

“नयी दिशा नयी दशा…नयी रीति नयी नीति…नए भारत को, सच्चे भारत के सपूतों को शत शत नमन…”, असे लिहित गायक कैलाश खेर यांनी भारतीय जवानांना अभिवादन केले आहे.

साऊथचे प्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांनी देखील आपल्या शैलीत भारताचे कौतुक केले आहे.

“आमचा देश आणि मानवाविरुद्ध दहशतवादी कारवाया करणाऱ्यांच्या भारतीय वायु दलाकडून करण्यात आलेल्या या कारवाईला माझा सलाम. जय हिंद.”, असे ट्विट प्रसिद्ध अभिनेता राजकुमार रावने केले आहे.

प्रसिद्ध विनोदी कलाकार आणि अभिनेता कपिल शर्माने देखील “आपल्याला भारतीय वायू दलाचा अभिमान आहे”, असे ट्विट केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदींना ‘आयुष्यमान भारत’ योजनेसाठी नोबेल द्यावा | डॉ. तमिलीसाई सुंदरराजन

swarit

लॉकडाऊनमध्ये कोणतीही विशेष ट्रेन चालवण्यात येणार नाही, रेल्वे मंत्रालयाचे स्पष्टीकरण

News Desk

कोरोनाच्या परिस्थितीविषयी चर्चा करण्यासाठी केंद्राची ४ डिसेंबरला बैठक होणार

News Desk