HW News Marathi
देश / विदेश

राहुल गांधींची राफेल कराराच्या किंमती संदर्भातील सर्व वक्तव्ये खोटी | अरुण जेटली

नवी दिल्ली | राफेल करारवरून राहुल गांधींनी सुरु केलेला वाद हा अत्यंत बाळबोध असून ह्यावरूनच त्यांची समजून घेण्याची क्षमता किती कमी आहे हे लक्षात येते, अशा शब्दात अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. राफेल करारासंदर्भात राहुल गांधींनी राफेल कराराच्या किमतीसंदर्भात केलेले प्रत्येक वक्तव्य खोटे असल्याचेही अरुण जेटली यांनी सांगितले.

ज्या सुरक्षेची भारताला अत्यंत आवश्यकता आहे त्याच सुरक्षेशी काँग्रेस तडजोड करू पाहत आहे का,असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. २००७ च्या राफेल ऑफरच्या संदर्भात राहुल गांधींनी त्यांच्या प्रत्येक वेळेच्या भाषणात राफेल कराराच्या वेगवेगळ्या किंमती सांगितल्या. २००७ च्या तुलनेत २०१६ मध्ये मूलभूत विमानाची किंमत ९% स्वस्त आणि शास्त्रात्रयुक्त लोडेड विमाने ही २०% स्वस्त आहेत, ही माहिती काँग्रेस पक्षाला हे का? असाही प्रश्न त्यांनी यावेळी राहुल गांधींना केला.

एकदा करार पूर्ण झाला कि त्यानंतर तो करार कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीला (सीसीएस) पाठवला जातो. सीसीएसने राफेल कराराला मान्यता दिली त्यानंतरच या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. हे राहुल गांधी यांना माहित आहे का? असाही सवाल त्यांनी केला. ते आज एएनआयच्या मुलाखतीत बोलत होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

कुत्र्याच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने दोघींची आत्महत्या

News Desk

भाजपच्या पराभवाची मालिका आता थांबणार नाही, पवारांनी केले ‘आप’चे अभिनंदन

swarit

चिमुकलीच्या तोंडात सुतळी बॉम्ब ठेऊन पेटवला

swarit
कृषी

बोंड अळी प्रादुर्भावामुळे तीन कंपन्यांवर गुन्हा दाखल

News Desk

अमरावती | तीन बियाणे कंपन्यांच्या कापसाच्या वाणांवर १०० टक्के बोंड अळीचा प्रादुर्भाव असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या होत्या. शेतकऱ्यांनी फुलांवर बोंड अळी दिसल्याच्या तक्रारी पंचायत समितीकडे केल्या. या तक्रारींनंतर बेनोडा पोलिसांनी संबंधित कंपन्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. यासंबंधी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तालुका कृषी कार्यालयात आंदोलन केले. त्यानंतर मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली.

प्राथमिक पाहणी अहवालात जिल्हास्तरीय समितीने संबंधित कंपन्यांच्या वाणांवर १०० टक्के बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे निरीक्षण नोंदवले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलन केल्यानंतर अंकुर सीडस प्रायव्हेट लिमिटेड नागपूर, बायर बायोसायन्स प्रा. लि. माधापूर हैदराबाद, राशी सिडस प्रा. लि. अत्तुर, तामिळनाडू कारवाई करण्यात आली. राज्यात पहिल्यांदाच शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून अशा प्रकारचा फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related posts

”पेसा”मुळे सौरऊर्जेने ठाणपाड्यात पाणी

News Desk

अर्थसंकल्पात शेतकरी हाच केंद्रबिंद

News Desk

राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत योजनेसाठी विविध घटकांनी 31 जुलै पर्यंत नोंदणी करा – कृषी विभागाचे आवाहन

News Desk